शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जिल्ह्यातील २५७ गावांचे बदलतेय रूपडे...

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : ‘गाव करी ते राव ना करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे; परंतु त्यासाठी गावालाही अगोदर योग्य दिशा मिळायला हवी.

औरंगाबाद : ‘गाव करी ते राव ना करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे; परंतु त्यासाठी गावालाही अगोदर योग्य दिशा मिळायला हवी. समाजभान जागृतीचे ध्येय जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने मनावर घेतले अन् आता जिल्ह्यातील तब्बल २५७ गावे कात टाकतायत. अस्वच्छतेसह विविध समस्यांनी वेढलेली ही गावे आता रूपडे बदलू लागली आहेत. स्वच्छतेची अभियाने जिल्ह्यात सतत राबविली जात आहेत. स्वच्छता ही सवय आणि वर्तन व्हावे, ती लोकचळवळ व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत; परंतु गावे स्वच्छ होतात, पुरस्कार मिळवितात व त्यानंतर पुन्हा शैथिल्य येते. चळवळ थांबते. अस्वच्छता पुन्हा तुंबत जाते. त्यासाठी पुन्हा अन् पुन्हा अभियान घ्यावे लागते. सरकारी पातळीवरून असे पुरस्कारयुक्त अभियान सतत घोषित होत नाही. त्यामुळे वळणावर आलेल्या गावाचा पुन्हा फज्जा उडण्यास वेळ लागत नाही. यावर उपाय काय काढावा, असा विचार सुरू झाला व उत्तर मिळाले आयएसओ नामांकनाचे.पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके सांगतात की, अभियानापेक्षा आयएसओ बरे असे विचारमंथनानंतर आम्ही ठरविले. कारण अभियानात पुरस्कार असतो. पुरस्कार मिळाला की चवळवळ क्षीण होते; परंतु आयएसओचे तसे नाही. एक तर हा पुरस्कार नाही. दर्जा आहे. सेवेचा दर्जा. ग्रामपंचायत कोणत्या दर्जाची सेवा देते, हे त्यातून स्पष्ट होते. आयएसओमध्ये सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांना एक वर्गणी भरावी लागते. शिवाय हा दर्जा टिकविण्यासाठी ठराविक कालाने पुन्हा नामांकन करून घ्यावे लागते. त्यामुळे लोकचळवळीचे शैथिल्य काही प्रमाणात कमी होईल. दर्जा टिकविण्यासाठी कामात सातत्य हवे आहेच.जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायती आता आयएसओच्या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत; परंतु त्यासाठी प्रशासनाला मोठे दिव्य करावे लागले. ते म्हणजे ग्रामस्थांची उमेद वाढविण्याचे. त्यासाठी आयएसओचे फायदे गावच्या सरपंचासह कारभाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सतत शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यातून आता गावच्या कारभाऱ्यांची मानसिकता चांगलीच बदलली आहे. हे गावात दिसणाऱ्या बदलातून स्पष्ट दिसते. औरंगाबादपासून जवळच असलेल्या कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या इमारतीकडे पाहिले तरी गावाने बदललेली कूस सहज दिसते. या २५७ गावांतील ग्रामपंचायत इमारती रंगरंगोटीने अक्षरक्ष: नव्या नवरीसारख्या सजल्या आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व तलाठ्याच्या दालनांना कॉर्पोरेट लूक आला आहे. नवे टेबल, खुर्च्या आणि आकर्षक फर्निचर. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड व्यवस्थित केले जात आहे. संग्राम कक्षाद्वारे सर्व व्यवहारांच्या नोंदी आॅनलाईन केल्या जात आहेत. ग्रामस्थांना प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. करवसुलीवर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासह ग्रामस्थांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष पुरविले जात आहे. स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. कुंड्या वाटप, त्यांच्या जागा निश्चित होत आहेत. ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. पूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांना वर्षभर मोफत दळण दळून देण्याची व्यवस्था अनेक ग्रामपंचायतींनी केली आहे. मिनरल वॉटरचे प्लॅन्ट ३० ग्रामपंचायतींमधून उभारण्यात येणार आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना क्लोरिनयुक्त शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा, असा दंडक घालण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गावांच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण करून त्या रोपट्यांना ट्रीगार्ड लावून संरक्षित केले जात आहे. गावात रोड तयार करून व पेव्हर ब्लॉक टाकून गल्ल्या सुंदर केल्या जात आहेत. गरोदर महिलांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने सुसज्ज माहेरघर उभारले आहे. या माहेरघरात गरोदर महिला येऊन आराम करू शकतात. त्यासाठी पलंग, टीव्ही, वृत्तपत्रे आणि गर्भसंस्काराची पुस्तिका पुरविण्यात आली आहे.