शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

गारपीटग्रस्तांचा धडकला मोर्चा

By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST

परभणी: गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईतून वगळण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,

परभणी: गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईतून वगळण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.अवकाळी पाऊस व गारपिटीतील नुकसानीच्या भरपाईपासून जिल्हा प्रशासनाने हजारो शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. अनुदान वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अनुदान मिळालेल्या गावाला लागून असलेल्या दुसऱ्या गावातील शिवारातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेतीमालाच्या किमान आधारभूत किमती केवळ कागदावरच आहेत. ५ मे रोजी अनुदानापासून वगळलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ७१ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या सर्व गावांतील शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना राज्य अधिवेशनामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिल्या आहेत. त्यावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. नुकसान भरपाई वाटप न झाल्यास जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. कॉ.विलास बाबर, कॉ.लिंबाजी कचरे, कॉ.किर्तीकुमार बुरांडे, उद्धव पौळ, दीपक लिपने, शिवराज सोनटक्के, ज्ञानोबा दळवे, उत्तम शेळके, पांडुरंग पवार, सुभाषराव गोरे, एकनाथ सिरसाट, त्र्यंबक वैरागर, विष्णू मोगले, राजेंद्र मोरे, बळीराम शिंदे आदींसह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.मोर्चेकऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी स्वीकारले. यासंदर्भात ३० जून रोजी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.(प्रतिनिधी)