शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

केंद्रीय पथक शहरात दाखल, गोपनीय पद्धतीने स्वच्छ सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:03 IST

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहराने कोण कोणती तयारी केली याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. ...

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहराने कोण कोणती तयारी केली याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. या पथकाने आपले कामही सुरू केले. मात्र महापालिकेकडून याची प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पथकाने ठिकठिकाणी पाहणी दौरा सुरू केला. गुरुवारी आणखी एक जण पथकात सहभागी होणार आहे.

केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे स्वच्छ आणि सुंदर व्हावीत या उद्देशाने ६ वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. अभियानात गेल्यावर्षी औरंगाबाद शहराची रँकिंग पूर्वीच्या तुलनेत सुधारली. मागील वर्षी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी केली होती. यंदा महापालिकेकडून पाहिजे तशी तयारी करण्यात आलेली नाही. आपले पितळ उघडे पडेल अशी भीती महापालिकेला वाटत आहे. मागील आठ दिवसांपासून केंद्र शासनाचे प्रथम कधी येणार अशी विचारणा माध्यमांकडून वारंवार घनकचरा विभागाला करण्यात येत होती. मात्र केंद्र शासनाकडून यासंदर्भात कोणतेही पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पथक शहरात दाखल होत असते. मंगळवारी केंद्र शासनाने नेमलेल्या पथकातील कर्मचारी महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर पथकाने महापालिकेच्या घनकचरा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाला सुरुवात केली.

पथकाने पहिल्या दिवशी काय काय बघितले

पहिल्या दिवशी खडकेश्वर येथील रस्ता, या भागातील व्यापाऱ्यांकडे कचरा टाकण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत. साफ सफाई कशी आहे, याची पाहणी केली. मिलिंद महाविद्यालय परिसर, जुन्या शहरातील बुढीलेन परिसरातील वसाहतीत जाऊन पाहणी केली. हर्सुल येथे शौचालये आणि मध्यवर्ती जकात नाक्यासह मध्यवर्ती बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. चौधरी कॉलनी, मिसारवाडी, आरतीनगर, जयसिंगपुरा आदी भागात पथकाने पाहणी केली.

तीन वर्षांपूर्वी स्वीकारली होती लाच

केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पाहण्यासाठी खाजगी संस्थेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पथकातील कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपूर्वी महापालिकेने लाच घेताना रंगेहात पकडले सुद्धा होते. आता महापालिकेकडून पथकाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे.