शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

केंद्रीय पथक शहरात दाखल, गोपनीय पद्धतीने स्वच्छ सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:03 IST

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहराने कोण कोणती तयारी केली याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. ...

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहराने कोण कोणती तयारी केली याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. या पथकाने आपले कामही सुरू केले. मात्र महापालिकेकडून याची प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पथकाने ठिकठिकाणी पाहणी दौरा सुरू केला. गुरुवारी आणखी एक जण पथकात सहभागी होणार आहे.

केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे स्वच्छ आणि सुंदर व्हावीत या उद्देशाने ६ वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. अभियानात गेल्यावर्षी औरंगाबाद शहराची रँकिंग पूर्वीच्या तुलनेत सुधारली. मागील वर्षी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी केली होती. यंदा महापालिकेकडून पाहिजे तशी तयारी करण्यात आलेली नाही. आपले पितळ उघडे पडेल अशी भीती महापालिकेला वाटत आहे. मागील आठ दिवसांपासून केंद्र शासनाचे प्रथम कधी येणार अशी विचारणा माध्यमांकडून वारंवार घनकचरा विभागाला करण्यात येत होती. मात्र केंद्र शासनाकडून यासंदर्भात कोणतेही पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पथक शहरात दाखल होत असते. मंगळवारी केंद्र शासनाने नेमलेल्या पथकातील कर्मचारी महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर पथकाने महापालिकेच्या घनकचरा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाला सुरुवात केली.

पथकाने पहिल्या दिवशी काय काय बघितले

पहिल्या दिवशी खडकेश्वर येथील रस्ता, या भागातील व्यापाऱ्यांकडे कचरा टाकण्यासाठी कोणत्या सुविधा आहेत. साफ सफाई कशी आहे, याची पाहणी केली. मिलिंद महाविद्यालय परिसर, जुन्या शहरातील बुढीलेन परिसरातील वसाहतीत जाऊन पाहणी केली. हर्सुल येथे शौचालये आणि मध्यवर्ती जकात नाक्यासह मध्यवर्ती बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली. चौधरी कॉलनी, मिसारवाडी, आरतीनगर, जयसिंगपुरा आदी भागात पथकाने पाहणी केली.

तीन वर्षांपूर्वी स्वीकारली होती लाच

केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पाहण्यासाठी खाजगी संस्थेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पथकातील कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपूर्वी महापालिकेने लाच घेताना रंगेहात पकडले सुद्धा होते. आता महापालिकेकडून पथकाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे.