शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

केंद्रीय पथक परतले औरंगाबादेतूनच माघारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 23:53 IST

जालना : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १४ हजार ३० कामे पाच वर्षांपासून रखडली आहेत.

जालना : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १४ हजार ३० कामे पाच वर्षांपासून रखडली आहेत. दरम्यान, या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ५ ते ७ जानेवारी याकळात येणार होते. मात्र, हे पथक औरंगबाद येथूनच दिल्लीला परतल्याची माहिती सूत्रानी दिली. असे असले तरी हे पथक अचानक कधीही पाहणीसाठी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात चार वर्षांपासून सतत दुष्काळी वातावरण होते. दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारने तहसील कार्यालय,पंचायत समिती, कृषि विभाग, सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनीक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग आदी विभागांमार्फत तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामे करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यात मंजूर कामांच्या ५८ टक्केच कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ४२ टक्के कामे प्रलंबित आहेत. यातील बहुतांश कामे हे अर्धवट आहेत. पैकी काही कामांबाबत गंभीर तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत.यात सर्वाधिक कामे सिंचन विहिरींची अर्धवट आहेत. तर काही ठिकाणी कामे मंजूर होऊनही अद्याप सुरूच झालेली नाहीत. काहीनी एका गटात मंजुरी असताना दुसऱ्या गटात काम सुरू केले आहे. काही कामे निधीअभावी, तर काही तांत्रिक कारणांमुळे रखडली आहेत. याबाबत लोकमतने विशेष पान प्रकाशित करून मग्रारोहयोच्या कामांचे पितळ उघडे पाडले होते. त्याची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळेच प्रलंबित कामांच्या व सद्यस्थितीतील कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जालन्यात येणार होते. मात्र, ते औरंगाबाद येथूनच परतले. (प्रतिनिधी)