शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

केंद्रीय पथक परतले औरंगाबादेतूनच माघारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 23:53 IST

जालना : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १४ हजार ३० कामे पाच वर्षांपासून रखडली आहेत.

जालना : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १४ हजार ३० कामे पाच वर्षांपासून रखडली आहेत. दरम्यान, या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ५ ते ७ जानेवारी याकळात येणार होते. मात्र, हे पथक औरंगबाद येथूनच दिल्लीला परतल्याची माहिती सूत्रानी दिली. असे असले तरी हे पथक अचानक कधीही पाहणीसाठी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात चार वर्षांपासून सतत दुष्काळी वातावरण होते. दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारने तहसील कार्यालय,पंचायत समिती, कृषि विभाग, सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनीक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग आदी विभागांमार्फत तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामे करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यात मंजूर कामांच्या ५८ टक्केच कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ४२ टक्के कामे प्रलंबित आहेत. यातील बहुतांश कामे हे अर्धवट आहेत. पैकी काही कामांबाबत गंभीर तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत.यात सर्वाधिक कामे सिंचन विहिरींची अर्धवट आहेत. तर काही ठिकाणी कामे मंजूर होऊनही अद्याप सुरूच झालेली नाहीत. काहीनी एका गटात मंजुरी असताना दुसऱ्या गटात काम सुरू केले आहे. काही कामे निधीअभावी, तर काही तांत्रिक कारणांमुळे रखडली आहेत. याबाबत लोकमतने विशेष पान प्रकाशित करून मग्रारोहयोच्या कामांचे पितळ उघडे पाडले होते. त्याची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळेच प्रलंबित कामांच्या व सद्यस्थितीतील कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जालन्यात येणार होते. मात्र, ते औरंगाबाद येथूनच परतले. (प्रतिनिधी)