शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

केंद्र सरकारकडे १५० कोटींची मागणी

By admin | Updated: June 16, 2014 01:08 IST

औरंगाबाद : मध्यवर्ती जकात नाक्याच्या जागेवर २५० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यासाठी महापालिका मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहे.

औरंगाबाद : मध्यवर्ती जकात नाक्याच्या जागेवर २५० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यासाठी महापालिका मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाला १५० कोटींची गरज असून, केंद्र शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहरात राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिक ा केंद्र शासनाच्या नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत जकात नाक्यावर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाकडे यासंदर्भात प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.एकीकडे शहरातील जुनी आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यावर मनपा भर देत असताना मध्यवर्ती जकात नाक्यावर १५० कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्याच्या प्रस्तावावरही भर देत आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मनपाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत हिरवी झेंडी दाखविली होती. आता नवीन सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी मनपाने कंबर कसली आहे. या कामात राजकीय इच्छाशक्तीचीही मदत घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. भविष्यात मनपाने मध्यवर्ती जकात नाक्यावर पीपीपी मॉडेलनुसार इमारत बांधल्यास ती चालविण्यासाठी कोणाला द्यावी, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली. अपोलो हॉस्पिटल, वोक्हार्ट कंपनीसह शहरातील आणखी काही रुग्णालयांशी मनपा प्रशासनाने चर्चा केली. दोन कोटींचा निधी प्राप्तशहरात मनपातर्फे ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे आणि छोटे दवाखाने चालविण्यात येतात. काही रुग्णालयांमध्ये डिलिव्हरीची सोयही आहे. शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यात मनपा अपयशी ठरत आहे. कारण मनपाकडे कोणतीच साधने उपलब्ध नाहीत.आरोग्य सेवा आणखी दर्जेदार बनविण्यासाठी केंद्राच्या एनयूएचएम योजनेचा लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या योजनेंतर्गत आतापर्यंत मनपाला दोन कोटींचा मुबलक निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी दिली.केंद्राच्या निधीतून चिकलठाणा आणि नेहरूनगर येथील आरोग्य केंद्रांवर ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे.दहा हजार लोकवस्तीला एक आरोग्य केंद्र असावे, असे नमूद केले आहे. महापालिकेने योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली असून, शहराच्या आजूबाजूला झपाट्याने नवीन वसाहती निर्माण होत आहेत. त्या वसाहतींमध्ये तब्बल पाच आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येतील.१४ आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्यात येतील. नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यासंबंधी चांगल्या सोयी- सुविधा देण्याचा मानस आहे.नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत १५१ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियाही मनपाने सुरू केली आहे.