शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

जनावरांचे गोठे नियमांच्या कात्रीत

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

वार्ताहर, कळंब/भूम शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

वार्ताहर, कळंब/भूमशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याला जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु, प्रशासनाकडून मात्र या प्रस्तावांना नियमांची कात्री लावली जात असून, काही ठिकाणी प्रस्तावांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कळंब तालुक्यात ३ हजार १२५ तर भूम तालुक्यातील ४०७ प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपासून प्रतीक्षाकळंब : तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ३१२५ गोठ्यांचे प्रस्ताव घेवून सहा महिने लोटले असून, अद्यापही प्रशासनाच्या लालफितीत हे प्रस्ताव धूळखात पडले आहेत़ प्रस्ताव मंजुरीकडे अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याने लाभार्थी शेतकरी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत़महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा सर्व घटकांपर्यंत लाभ मिळावा यासाठी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, गांडूळखत निर्मिती, कुक्कुटपालन शेड, नॅडपेखत निर्मिती, अमृतपाणी खड्डा आदी कामे हाती घेण्यात आली आहेत़ याच अनुषंगाने तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ३१२५ गोठ्यांचे प्रस्ताव सहा महिन्यापूर्वी घेण्यात आले़ मात्र, अद्यापही हे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात धूळखात पडले आहेत़ तसेच जलसंधारणाची कामे, शेततळी, माती नाला बांध, शोषखड्डे, दगडी पौळ, समतलचर खोदणे, भूमिगत बंधारे, नालासरळीकरण, विहिरी पुर्नभरण आदी कामाकडेही संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ दरम्यान, सध्या विहिरीच्या ४७ कामावर ८०१ मजूर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ तर कृषी पालकतांत्रिक अधिकाऱ्याकडे रोहयोतील रस्ता कामाचे मुल्यांकन करण्याचे आदेश दिल्याने चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ (वार्ताहर)४५ ग्रा.पं.चे प्रस्तावभूम : ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘जनावरांसाठी निवारा’ या योजनेच्या माध्यमातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. तालुकाभरातून ४०७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, भूम पंचायत समितीने याबाबतीत कुठलाच निर्णय घेतलेला नाही. मागील पाच महिन्यांपासून संबंधित प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. पंचायत समितीच्या या कारभारावर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठ्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. एका ग्रामपंचायतीसाठी ५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जवळपास ४५ ग्रामपंचायतींनी ४०६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होवून गोठा उभारणीचे कामही पूर्ण होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, पंचायत समितीच्या चालढकलपणामुळे हे प्रस्ताव धुळखात पडून आहेत. यातील एकाही प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासन पावसाळा सुरू झाल्यानंतर मंजुरी देणार काय? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आलेले बहुतांश प्रस्ताव ६०:४० च्या निकषात बसत नसल्याचे सांगितले जाते. (वार्ताहर)प्रभारीमुळे कामे खोळंबलीकळंब पंचायत समितीत प्रभारी राज असून, एका वर्षात पाच अधिकाऱ्यांना प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता़ अनेक कामे खोळंबली आहेत़ शेतकऱ्यांच्या जनावरांचे गोठे कुक्कुटपालन शेडसह इतर कामेही खोळंबल्याचे उपसभापती लक्ष्मण आडसूळ यांनी सांगितले़प्रक्रिया सुरू आहेमग्रारोहयो योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभातील जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड, शौचालय आदी कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे़ मंजुरीनंतर ही कामे लवकरच हाती घेण्यात येतील, असे कळंब पंसचे प्रभारी गटविकास अधिकारी के़एस़यमपुरे यांनी सांगितले़एकेका ठिकाणाहून पंचवीसवर प्रस्तावप्रत्येक ग्रामपंचायतीकडून पाच प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्रत्यक्षात एकेका ग्रामपंचायतीने २५ प्रस्ताव दाखल केले आहेत. ही अट शिथिल करून जास्तीत जास्त प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.