शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम

By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST

जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगीतून तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे तरी कोणाला, असा शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न उभा राहिला आहे.

जालना : जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घनसावंगीतून तुल्यबळ उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे तरी कोणाला, असा शिवसेना पक्षश्रेष्ठींसमोर प्रश्न उभा राहिला आहे.जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. विशेषत: जालना, भोकरदन व परतूर या तीन मतदारसंघात मातब्बर असे प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित आहेत. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संकेतानंतरच ते कामाला लागले आहेत. या प्रतिस्पर्ध्यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर होणे एवढाच सोपास्कार बाकी आहे. त्यामुळेच जालना, भोकरदन व परतूरमधून सत्तारुढ व विरोधी पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गेल्या एक दीड महिन्यापासून उमेदवारी पटकावल्याच्या थाटातच मोर्चेबांधणीत दंग आहेत. जालन्यातून विद्यमान आ. कैलास गोरंट्याल, माजीमंत्री अर्जुन खोतकर हे दोघे मातब्बर एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. भोकरदनमधून विद्यमान आमदार चंद्रकांत दानवे हे पुन्हा रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. तेथून दानवेंविरुध्द दानवेच अशी लढाई होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपूत्र संतोष दानवे हेच रिंगणात उतरतील असे स्पष्ट संकेत आहेत. परतूरमधून आ. सुरेश जेथलिया हे कॉँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. चार दिवसांपूर्वीच ते कॉँग्रेसवासी झाले. उमेदवारी पटकविण्यासह. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर हे तेथून पुन्हा जेथलियांविरोधात रणशिंग फुंकणार हे स्पष्ट आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे लोकसभा निवडणुकीपासूनच घनसावंगीत मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत. परंतू त्यांच्या विरोधात शिवसेना तुल्यबळ उमेदवार म्हणून कोणास रिंगणात उतरवणार असा प्रश्न उभा राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत तेथून शिवसेनेने मताधिक्य पटकाविल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोबलसुध्दा उंचावले खरे. परंतू शिवसेना पक्षश्रेष्ठी उमेदवाराबाबत द्विधा मनस्थितीत जाणवत आहे.माजी आ. शिवाजीराव चोथे हे स्वत:स उमेदवारी मिळावू म्हणून प्रयत्नशील आहेत. तर समाजवादी पक्षास सोडचिठ्ठी देवून बाहेर पडलेले माजी आ. विलासराव खरात हे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी ‘मातोश्री’च्या वाऱ्या करीत आहेत. हे दोघेही एनकेन प्रकारे उमेदवारीसाठी प्रतिष्ठा करीत असल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुध्दा उमेदवारीचा तिढा कायम आहे.बदनापूरातून शिवसेनेचे विद्यमान आ. संतोष सांबरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून कोणास उमेदवारी मिळेल, हे स्पष्ट नाही. माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी मोर्चेबांधणीत दंग आहेत. तेच प्रतिस्पर्धी म्हणून आघाडीवर आहेत. परंतू राष्ट्रवादीअंतर्गत अन्य इच्छूकांनी त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणीत स्वत:च्या उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्या आहेत. (प्रतिनिधी)कॉँग्रेस आघाडीसह महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप पर्यंत न सुटल्याने मित्र पक्षातील इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास संधी मिळू शकेल म्हणून या जिल्ह्यातील दबा धरुन बसलेल्या इच्छूकांच्या आशा-आकांक्षा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.४मुंबई, दिल्लीतील या घडामोडींवर जोपर्यंत पडदा पडणार नाही, तोपर्यंत जागा सोडून घेण्यासह उमेदवारीसाठी किल्ला लढविण्याचा संकल्प या इच्छूकांनी केला आहे.