शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

संसद सचिवासाठी उमेदवारांची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

बीड : राजकीय पक्षांचे राजकारण आणि महाविद्यालयातील राजकारण यांची तुलना आता जवळपास समजली जाते. सध्या महाविद्यालयाचा संसद सचिव होण्यासाठी विद्यार्थ्यांनी

बीड : राजकीय पक्षांचे राजकारण आणि महाविद्यालयातील राजकारण यांची तुलना आता जवळपास समजली जाते. सध्या महाविद्यालयाचा संसद सचिव होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवारांनी जोरात फिल्डींग लावली असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांनी राजकारण कसे असते हे अनुभवले. आता लोकसभा निवडणूक संपल्या असून विधानसभेची जय्यत तयारी राजकीय स्तरावर केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी महाविद्यालयातील संसद सचिवाच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील वर्ग प्रतिनिधींची निवड जवळपास करण्यात आली आहे. आता प्रत्येकाला वेध लागले आहे, संसद सचिवाच्या निवडणुकीचे. कोण होणार संसद सचिव? काय काम करणार? कोणाकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता आहे. यासारखे अनेक मुद्दे लक्षात घेऊन वर्गप्रतिनिधी आपले अमूल्य मत देणार आहेत. आपणच संसद सचिव होणार असा विश्वासही अनेक उमेदवारांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येकजण आपआपली व्युहरचना आखू लागला आहे़ प्रत्येकजण वर्ग प्रतिनिधींशी संपर्क वाढवू लागला आहे़ वर्ग प्रतिनिधीही उमेदवारांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. १ सप्टेंबर रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर ५ वाजेपर्यंत अर्जांची छाननी झाली. गुरुवारी उमेदवारांनी भरलेला फॉर्म माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवार आपला अर्ज माघारी घेऊ शकतो, असे डॉ. अमोल पालकर यांनी सांगितले. १५ सप्टेंबरला मतदान संसद सचिवाच्या निवडीसाठी १५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते एक दरम्यान मतदान प्रक्रिया चालणार आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमोल पालकर, प्रा. अनिल चिंधे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे प्रश्न संसद सचिवांनी सोडवावेत, त्यांच्याशी मिळून मिसळून रहावे, असा संसद सचिव वर्ग प्रतिनिधींनी निवडावा, असे प्राचार्य डॉ. वसंत सानप यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी अर्ज कोण माघारी घेणार आणि कोण ठेवणार? हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागली असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)