शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाढीव पाणीपट्टीचा ठराव रद्द करा

By admin | Updated: May 24, 2014 01:40 IST

जालना : जालनेकरांच्या माथी तीन पट पाणीपट्टी या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून वाढलेल्या पाणी पट्टीचा मुद्दा जनतेसमोर आणताच शुक्रवारी सर्वसामान्य जनतेसह

जालना : जालनेकरांच्या माथी तीन पट पाणीपट्टी या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून वाढलेल्या पाणी पट्टीचा मुद्दा जनतेसमोर आणताच शुक्रवारी सर्वसामान्य जनतेसह विविध संघटनांनी या विरोधात आवाज उठविला. जिल्हाधिकार्‍यांना, मुख्याधिकार्‍यांना याबाबत निवेदन देवून ही वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी केली. जालना नगर पालिकेने पाणीपट्टीचे कर ८०० रूपयावरून थेट २७०० रूपये केला. त्याच्या वसुलीसाठी दोन पथक नेमून माहिमेस सुरवात केली. याबाबत शुक्रवारच्या अंकात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. हा वाढीव कर तात्काळ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेने २० मे २०१३ रोजी पाणीपट्टी जवळपास चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस सर्वसाधारण सभेत व सभागृहाबाहेरसुद्धा विरोधी पक्षानी यानिर्णयाला विरोध करून सर्वसामान्य नागरीकांना परवडेल इतकी योग्य दरवाढ करण्याचे सुचविले होते.परंतू नगर पालिकेने प्रोसिडींगवर याची दखल न घेता हा ठराव पास झाल्याचे दर्शविले व आता या आवाजवी पाणीपट्टी वसूलीची प्रक्रिया सुरू केली.नगर पालिकेकडून दिले जाणारे कारण हे न पटणारे आहे. शहागडवरून पाणी उचलत असताना दर दोन ते तीन दिवसाला देत असताना तेव्हाही योजनेचे बिल २० ते २५ लक्ष रूपये महिन्याला येत असतानाही पाणी पट्टी ८०० रूपयेच होते. आता जायकवाडी योजनेतून १० एमएलडी व घाणेवाडीतून कसल्याही खर्चाविना ४ एमएलडी पाणी उचलण्यात येते. बिल २० ते २५ लाख रूपये प्रतिमहिनाच येते. नागरिकांना पाणी पुरवठा मात्र १० ते १५ दिवसात एकदा केला जातो, मग कशाच्या आधारे एवढी दरवाढ केली हे समजण्यासारखे नाही. गोरगरीब जनतेकडून १० ते १२ कोटी रूपयाचे कर वसूल केल्यानंतरही पाण्याचे बिल पालिका भरत नाही. यावर्षी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाने वित्त आयोगाच्या निधीतून पाणी पुरवठ्याचे बिल भरले. मग जनतेकडून वसूल केलेला पैसा जातो कुठे? कार्यकर्ते व गुत्तेदारांचे बोगस बिले जनतेच्या पैशातून अदा केली जात असल्याचा आरोपही करून वाढीव पाणी पट्टीचा निर्णय न.प. अधिनियम कलम ३०८ नुसार रद्द करावा नसता तीव्र आदोंलन करण्याचा इशारा अंबेकर यांनी दिला आहे. देवा सामाजिक संघटना- पालिकेने नळपट्टी बाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. औरंगाबाद महापालिका असताना त्याठिकानी पाणी पट्टी फक्त १६०० रूपये आहे. मग येथेच जास्तीची का असा सवाल करून हा वाढीव पाणीपट्टीचा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी केली त्यावर गणेश अजगे, नरेश धारपावळे, राजेश सूर्यवंशी, अनिल वानखेडे, परमेश्वर शिंदेआदीच्या सह्या आहेत.जालना नगर पालिकेने सुमारे तीन पट केलेली पाणीपट्टीची वाढ ही मराठवाड्यात सर्वाधिक पाणीपट्टी लावणारी नगर पालिका ठरली आहे. बीडमध्ये दररोज ३० एमएलडी पाणी उचल्यात येते तेथे महिन्याला २७ लाखाचे बिल येत असतानाही फक्त १५०० रूपये पाणीपट्टी आहे. लातूर, परभणी व औरंगाबाद येथे महानगर पालिका असतानाही या तिन्हीठिकाणी फक्त १६०० रूपये पाणीपट्टी आहे. उस्मानाबाद नगर पालिक ा १२५ कि़ मी. अंतरावरून पाणी उचलत असतानाही त्याठिकाणी १६०० रूपयेच पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र जालन्यात नगर पालिकेने चक्क २७०० रूपये पाणीपट्टी लावली. ती अन्यायकारक असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.