शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

वाढीव पाणीपट्टीचा ठराव रद्द करा

By admin | Updated: May 24, 2014 01:40 IST

जालना : जालनेकरांच्या माथी तीन पट पाणीपट्टी या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून वाढलेल्या पाणी पट्टीचा मुद्दा जनतेसमोर आणताच शुक्रवारी सर्वसामान्य जनतेसह

जालना : जालनेकरांच्या माथी तीन पट पाणीपट्टी या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून वाढलेल्या पाणी पट्टीचा मुद्दा जनतेसमोर आणताच शुक्रवारी सर्वसामान्य जनतेसह विविध संघटनांनी या विरोधात आवाज उठविला. जिल्हाधिकार्‍यांना, मुख्याधिकार्‍यांना याबाबत निवेदन देवून ही वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी केली. जालना नगर पालिकेने पाणीपट्टीचे कर ८०० रूपयावरून थेट २७०० रूपये केला. त्याच्या वसुलीसाठी दोन पथक नेमून माहिमेस सुरवात केली. याबाबत शुक्रवारच्या अंकात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. हा वाढीव कर तात्काळ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेने २० मे २०१३ रोजी पाणीपट्टी जवळपास चौपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस सर्वसाधारण सभेत व सभागृहाबाहेरसुद्धा विरोधी पक्षानी यानिर्णयाला विरोध करून सर्वसामान्य नागरीकांना परवडेल इतकी योग्य दरवाढ करण्याचे सुचविले होते.परंतू नगर पालिकेने प्रोसिडींगवर याची दखल न घेता हा ठराव पास झाल्याचे दर्शविले व आता या आवाजवी पाणीपट्टी वसूलीची प्रक्रिया सुरू केली.नगर पालिकेकडून दिले जाणारे कारण हे न पटणारे आहे. शहागडवरून पाणी उचलत असताना दर दोन ते तीन दिवसाला देत असताना तेव्हाही योजनेचे बिल २० ते २५ लक्ष रूपये महिन्याला येत असतानाही पाणी पट्टी ८०० रूपयेच होते. आता जायकवाडी योजनेतून १० एमएलडी व घाणेवाडीतून कसल्याही खर्चाविना ४ एमएलडी पाणी उचलण्यात येते. बिल २० ते २५ लाख रूपये प्रतिमहिनाच येते. नागरिकांना पाणी पुरवठा मात्र १० ते १५ दिवसात एकदा केला जातो, मग कशाच्या आधारे एवढी दरवाढ केली हे समजण्यासारखे नाही. गोरगरीब जनतेकडून १० ते १२ कोटी रूपयाचे कर वसूल केल्यानंतरही पाण्याचे बिल पालिका भरत नाही. यावर्षी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाने वित्त आयोगाच्या निधीतून पाणी पुरवठ्याचे बिल भरले. मग जनतेकडून वसूल केलेला पैसा जातो कुठे? कार्यकर्ते व गुत्तेदारांचे बोगस बिले जनतेच्या पैशातून अदा केली जात असल्याचा आरोपही करून वाढीव पाणी पट्टीचा निर्णय न.प. अधिनियम कलम ३०८ नुसार रद्द करावा नसता तीव्र आदोंलन करण्याचा इशारा अंबेकर यांनी दिला आहे. देवा सामाजिक संघटना- पालिकेने नळपट्टी बाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. औरंगाबाद महापालिका असताना त्याठिकानी पाणी पट्टी फक्त १६०० रूपये आहे. मग येथेच जास्तीची का असा सवाल करून हा वाढीव पाणीपट्टीचा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी केली त्यावर गणेश अजगे, नरेश धारपावळे, राजेश सूर्यवंशी, अनिल वानखेडे, परमेश्वर शिंदेआदीच्या सह्या आहेत.जालना नगर पालिकेने सुमारे तीन पट केलेली पाणीपट्टीची वाढ ही मराठवाड्यात सर्वाधिक पाणीपट्टी लावणारी नगर पालिका ठरली आहे. बीडमध्ये दररोज ३० एमएलडी पाणी उचल्यात येते तेथे महिन्याला २७ लाखाचे बिल येत असतानाही फक्त १५०० रूपये पाणीपट्टी आहे. लातूर, परभणी व औरंगाबाद येथे महानगर पालिका असतानाही या तिन्हीठिकाणी फक्त १६०० रूपये पाणीपट्टी आहे. उस्मानाबाद नगर पालिक ा १२५ कि़ मी. अंतरावरून पाणी उचलत असतानाही त्याठिकाणी १६०० रूपयेच पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र जालन्यात नगर पालिकेने चक्क २७०० रूपये पाणीपट्टी लावली. ती अन्यायकारक असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.