शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

तुटपुंज्या निधीवर आगाराची बोळवण

By admin | Updated: January 8, 2017 23:42 IST

बीड बसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो

राजेश खराडे बीडबसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो. मोठ्या दुरवस्थेमुळे जिथे रस्ता पुनर्बांधणीची गरज आहे त्याठिकाणच्या खड्ड्यांवर खडी आणि दगडगोटे अंथरूण मलमपट्टी केली जात आहे. उलटार्थी दुरूस्तीसाठीे अंथरलेल्या दगड-गोट्यांमुळे सुविधांपेक्षा प्रवाशांची अडचण अधिक झाली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट बाहेर पडण्याऱ्या रस्त्यापर्यंतच्या परिसरात मोठ-मोठे खड्डे आणि खडी उघडी पडली आहे. स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी बसगाडी मार्गस्थ होताच संपूर्ण स्थानक धुळीने माखून निघत आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने दुरूस्ती कामांना सुरूवात झाली खरी, मात्र तुटपुंज्या निधीमुळे मलमपट्टी केली जात आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशंषाने येथील स्थानक मध्यवर्ती आहे. त्यामुळे बसगाड्यांची मोठी वर्दळ असते. शिवाय जिल्ह्याचे स्थानक असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या, यात्रोत्सव यामधून दरवर्षी लाखोंचा फायदा होत असल्याचा निर्वाळा वाहतूक अधिकाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, त्यातुलनेत सोयीसुविधाही पुरविल्या जात नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली होती. तब्बल चार महिन्यांनंतर का होईना दुरूस्तीला सुरूवात झाली असली तरी कामाचा दर्जा ढासळला आहे. या दुरूस्तीकरिता केवळ ४८ हजार रूपये मंजुर झाल्याने दगड-गोठे व मोठ्या खडीने खड्डे बुजून घेतले जात आहेत. काळ्या मातीच्या जमीन क्षेत्रावर स्थानक वसले असल्याने पाऊस झाला की रस्ता खचत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दर्जात्मक कामच होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात स्थानकाला तळ्याचे स्वरूप येते. हे नियमित असले तरी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होत नाहीत हे विशेष.