शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

तुटपुंज्या निधीवर आगाराची बोळवण

By admin | Updated: January 8, 2017 23:42 IST

बीड बसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो

राजेश खराडे बीडबसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो. मोठ्या दुरवस्थेमुळे जिथे रस्ता पुनर्बांधणीची गरज आहे त्याठिकाणच्या खड्ड्यांवर खडी आणि दगडगोटे अंथरूण मलमपट्टी केली जात आहे. उलटार्थी दुरूस्तीसाठीे अंथरलेल्या दगड-गोट्यांमुळे सुविधांपेक्षा प्रवाशांची अडचण अधिक झाली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट बाहेर पडण्याऱ्या रस्त्यापर्यंतच्या परिसरात मोठ-मोठे खड्डे आणि खडी उघडी पडली आहे. स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी बसगाडी मार्गस्थ होताच संपूर्ण स्थानक धुळीने माखून निघत आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने दुरूस्ती कामांना सुरूवात झाली खरी, मात्र तुटपुंज्या निधीमुळे मलमपट्टी केली जात आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशंषाने येथील स्थानक मध्यवर्ती आहे. त्यामुळे बसगाड्यांची मोठी वर्दळ असते. शिवाय जिल्ह्याचे स्थानक असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या, यात्रोत्सव यामधून दरवर्षी लाखोंचा फायदा होत असल्याचा निर्वाळा वाहतूक अधिकाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, त्यातुलनेत सोयीसुविधाही पुरविल्या जात नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली होती. तब्बल चार महिन्यांनंतर का होईना दुरूस्तीला सुरूवात झाली असली तरी कामाचा दर्जा ढासळला आहे. या दुरूस्तीकरिता केवळ ४८ हजार रूपये मंजुर झाल्याने दगड-गोठे व मोठ्या खडीने खड्डे बुजून घेतले जात आहेत. काळ्या मातीच्या जमीन क्षेत्रावर स्थानक वसले असल्याने पाऊस झाला की रस्ता खचत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दर्जात्मक कामच होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात स्थानकाला तळ्याचे स्वरूप येते. हे नियमित असले तरी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होत नाहीत हे विशेष.