शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या निधीवर आगाराची बोळवण

By admin | Updated: January 8, 2017 23:42 IST

बीड बसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो

राजेश खराडे बीडबसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो. मोठ्या दुरवस्थेमुळे जिथे रस्ता पुनर्बांधणीची गरज आहे त्याठिकाणच्या खड्ड्यांवर खडी आणि दगडगोटे अंथरूण मलमपट्टी केली जात आहे. उलटार्थी दुरूस्तीसाठीे अंथरलेल्या दगड-गोट्यांमुळे सुविधांपेक्षा प्रवाशांची अडचण अधिक झाली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट बाहेर पडण्याऱ्या रस्त्यापर्यंतच्या परिसरात मोठ-मोठे खड्डे आणि खडी उघडी पडली आहे. स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी बसगाडी मार्गस्थ होताच संपूर्ण स्थानक धुळीने माखून निघत आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने दुरूस्ती कामांना सुरूवात झाली खरी, मात्र तुटपुंज्या निधीमुळे मलमपट्टी केली जात आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशंषाने येथील स्थानक मध्यवर्ती आहे. त्यामुळे बसगाड्यांची मोठी वर्दळ असते. शिवाय जिल्ह्याचे स्थानक असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या, यात्रोत्सव यामधून दरवर्षी लाखोंचा फायदा होत असल्याचा निर्वाळा वाहतूक अधिकाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, त्यातुलनेत सोयीसुविधाही पुरविल्या जात नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली होती. तब्बल चार महिन्यांनंतर का होईना दुरूस्तीला सुरूवात झाली असली तरी कामाचा दर्जा ढासळला आहे. या दुरूस्तीकरिता केवळ ४८ हजार रूपये मंजुर झाल्याने दगड-गोठे व मोठ्या खडीने खड्डे बुजून घेतले जात आहेत. काळ्या मातीच्या जमीन क्षेत्रावर स्थानक वसले असल्याने पाऊस झाला की रस्ता खचत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दर्जात्मक कामच होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात स्थानकाला तळ्याचे स्वरूप येते. हे नियमित असले तरी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होत नाहीत हे विशेष.