शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

तुटपुंज्या निधीवर आगाराची बोळवण

By admin | Updated: January 8, 2017 23:42 IST

बीड बसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो

राजेश खराडे बीडबसस्थानकातील खड्ड्यांमुळे असह्य असा प्रवास वाहक-चालकांसह प्रवाशांना करावा लागतो. मोठ्या दुरवस्थेमुळे जिथे रस्ता पुनर्बांधणीची गरज आहे त्याठिकाणच्या खड्ड्यांवर खडी आणि दगडगोटे अंथरूण मलमपट्टी केली जात आहे. उलटार्थी दुरूस्तीसाठीे अंथरलेल्या दगड-गोट्यांमुळे सुविधांपेक्षा प्रवाशांची अडचण अधिक झाली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून ते थेट बाहेर पडण्याऱ्या रस्त्यापर्यंतच्या परिसरात मोठ-मोठे खड्डे आणि खडी उघडी पडली आहे. स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी बसगाडी मार्गस्थ होताच संपूर्ण स्थानक धुळीने माखून निघत आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने दुरूस्ती कामांना सुरूवात झाली खरी, मात्र तुटपुंज्या निधीमुळे मलमपट्टी केली जात आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या अनुशंषाने येथील स्थानक मध्यवर्ती आहे. त्यामुळे बसगाड्यांची मोठी वर्दळ असते. शिवाय जिल्ह्याचे स्थानक असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. वाढती प्रवाशी संख्या, यात्रोत्सव यामधून दरवर्षी लाखोंचा फायदा होत असल्याचा निर्वाळा वाहतूक अधिकाऱ्यांकडून दिला जातो. मात्र, त्यातुलनेत सोयीसुविधाही पुरविल्या जात नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली होती. तब्बल चार महिन्यांनंतर का होईना दुरूस्तीला सुरूवात झाली असली तरी कामाचा दर्जा ढासळला आहे. या दुरूस्तीकरिता केवळ ४८ हजार रूपये मंजुर झाल्याने दगड-गोठे व मोठ्या खडीने खड्डे बुजून घेतले जात आहेत. काळ्या मातीच्या जमीन क्षेत्रावर स्थानक वसले असल्याने पाऊस झाला की रस्ता खचत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दर्जात्मक कामच होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात स्थानकाला तळ्याचे स्वरूप येते. हे नियमित असले तरी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय होत नाहीत हे विशेष.