शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

यालाच तर म्हणतात राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:05 IST

रऊफ शेख फुलंब्री : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे नेहमी बोलले जाते. त्यास आता राजकारणाची पण जोड ...

रऊफ शेख

फुलंब्री : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे नेहमी बोलले जाते. त्यास आता राजकारणाची पण जोड मिळाली आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याचा नेम नसतो. तसाच काहीसा प्रकार फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीदरम्यान पुढे आला आहे. शेवटच्या दिवशीच्या उलटफेरमध्ये पॅनलला सोडून दुसऱ्या पॅनलमध्ये जाऊन पाकिजा पठाण या सरपंच बनल्या. या अनपेक्षित बदलामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

जिल्ह्यातील वडोदबाजार ही ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते उत्सुक असतात. यंदाही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेस -शिवसेना मित्र पक्षाच्या पॅनलचे ८ तर भाजपच्या ग्रामविकास कष्टकरी गटाचे ७ सदस्य निवडून आले होते. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निघाल्यानंतर सर्वच सदस्य सहलीवर गेले होते. भाजप प्रणीत पॅनलचे ७ सदस्य असल्याने त्यांना बहुमतासाठी एका सदस्याची गरज होती. त्यांनी हेच हेरून विरोधी गटातील पाकिजा पठाण यांना गळ घालत थेट सरपंचपदाची ऑफर देत आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. या निर्णयामुळे बहुमत असून सुद्धा शेवटच्या क्षणी कॉंग्रेस -शिवसेना मित्र पक्षाच्या पॅनलला सत्तेपासून वंचित राहावे लागले.

----- रुग्णवाहिकेतून गावात प्रवेश ------

कॉंग्रेस - शिवसेना मित्र पक्षाच्या पॅनलचे आठ सदस्य निवडून आल्यानंतर सरपंच व उपसरपंचपदाचे दावेदार असलेल्या सदस्यासह सर्वांनाच सहलीवर नेले होते. यातील एकाही सदस्याने दगा दिला तर ग्रामपंचायतीच्या चाव्या हातातून जाणार असल्याची कल्पना सर्वांनाच होती. त्यामुळे सदस्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. परंतु, रविवारी पाकिजा पठाण यांच्या मुलाची तब्येत ठिक नसल्याने त्या माघारी परतल्या होत्या. आणि सोमवारी सरपंच निवडीदरम्यान त्या चक्क दुपारी रुग्णवाहिकेतून गावात आल्या; मात्र त्यांनी विरोधी पॅनलच्या माध्यमातून सरपंचपदासाठी अर्ज करत निवडीत बाजी मारली.