शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

रेशनच्या तांदळाची २९ रुपयांनी खरेदी

By admin | Updated: May 22, 2014 00:14 IST

उस्मानाबाद : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल शिधापत्रिका धारकांसाठी दोन महिन्यानंतर ५८३ मेट्रीक टन तांदूळ मंज़ूर झाला आहे.

 उस्मानाबाद : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल शिधापत्रिका धारकांसाठी दोन महिन्यानंतर ५८३ मेट्रीक टन तांदूळ मंज़ूर झाला आहे. हा तांदूळ प्रशासनाच्या वतीने २९ रुपयाने खरेदी करण्यात येणार असून तो रेशन दुकानावर ९ रूपये साठ पैसे दराने लाभधारकांना दिला जाणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरु झाली. जिल्ह्यातील ११ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यांच्यासाठी प्रतिमहा ८२१९.४८५ मेट्रिक टन इतके धान्य लागते. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो प्रमाणे गहू, ३ रुपयांप्रमाणे तांदूळ तर १ रूपयांप्रमाणे भरडधान्य वितरित केले जात आहे. मात्र एपीएल धारकांना गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाकडून धान्य पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८८६ लाभार्थी शिधापत्रिका धारकांना धान्याची टंचाई जाणवत होती. या लाभार्थ्यांना जवळपास तीन महिन्यापासून रेशनचे धान्य मिळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना महागडे अन्नधान्य खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, शासनाने आता २९ हजार ८१० मे.टन तांदूळ खरेदी करुन तो एपीएल शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानावरुन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात ९ रूपये ६० पैसे प्रती किलो याप्रमाणे प्रति कार्ड ५ किलो या प्रमाणे याचे वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)