शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘बुट्टेनाथ’चे काम रखडले शहरासमोर पाणीसंकट

By admin | Updated: April 15, 2016 00:37 IST

अंबाजोगाई : शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती हा सक्षम पर्याय ठरेल.

अंबाजोगाई : शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या टंचाईला तोंड देण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती हा सक्षम पर्याय ठरेल. मात्र पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नसल्यासह इतर तांत्रिक कारणांमुळे तब्बल दहा वर्षांपासून सदरील तलावाचे काम रखडले आहे. आता काम सुरु केल्यास ते लवकर पूर्णत्वास लागेल, असा कयास अंबाजोगाईकरांचा आहे.शहराला गेल्या पंधरा वर्षांपासून पाणीटंचाई तीव्रतेने भेडसावत आहे. मांजरा धरणाचा पर्याय सोडला तर वर्षभर अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा होईल असा एकही पर्यायी तलाव तालुका व परिसरात उपलब्ध नाही. जे आहेत त्यांची पाण्याची साठवण क्षमता अत्यल्प असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न भविष्यातही तीव्रतेने भेडसावणारा आहे. या टंचाई निवारणासाठी बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी या तलावाचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला. जलसंपदा विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला एप्रिल २०१३ मध्ये तत्वत: मान्यता मिळाली असून या साठवण तलावाच्या कामासाठी सर्व्हे, स्थळ पाहणी व प्रकल्प प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती. मात्र, हा निधी प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारात अडकून राहिला. अंबाजोगाई शहराला १.५० लाख लोकसंख्या गृहित धरून व सिंचन क्षेत्र ३६.२५ हेक्टर गृहित धरून १४.५० दलघमी पाणी क्षमता असलेला हा तलाव निर्माण झाला तर अंबाजोगाई शहराचा पाणीप्रश्न सहज सुटेल मात्र, या तलावाच्या कामाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी उपलब्ध करण्यासाठी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणे ही प्रक्रिया तांत्रिक बाबीत अडकल्याने या तलावाचे भवितव्य धोक्यात आहे. या तलावापासून नागापूर धरण जवळ असल्याने व हा परिसर नागापूर धरणाच्या कार्यक्षेत्रात असल्याने या तलावाची निर्मिती स्वप्न ठरते की काय? अशीच अवस्था प्रशासकीय कारभारातून समोर आली आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून बुट्टेनाथ साठवण तलावाची निर्मिती म्हणून पाहिले जाते. (वार्ताहर)पाणी संकट वर्षागणिक बिकट बनत चालले आहे. त्यामुळे पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.आजच्या किंमतीनुसार प्रोजेक्ट मंजूर झाल्यास तो कमी किंमतीत पूर्ण होऊ शकते, परंतु दोन-तीन वर्षांत बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्यानंतर काम पुन्हा निधी अभावी रखडू शकते.