शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

जळकोटला टंचाईच्या झळा

By admin | Updated: August 23, 2015 23:46 IST

जळकोट शहर व तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने भर पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला

जळकोट शहर व तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने भर पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे़ तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ गेल्या चार दिवसापासून जळकोट शहरातील तीनही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पाणीटंचाईत भर पडली असून, प्रशासनाच्या नियोजनाअभावी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना सहन करावा लागत आहे़ तालुक्यात सध्या दोन टँकर व २२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, तो अपुरा पडत आहे़ तालुक्यातील जळकोट मंडळात ३३३ मिलीमीटर तर घोणशी मंडळात २३९ मि़मी़ पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे़ तालुक्यातील ढोरसांगवी, जंगमवाडी, सोनवळा करंजी, वांजरवाडा, चेरा, गुत्ती, गुत्ती २, माळहिप्परगा, धोंडवाडी, शेलदरा, डोमगाव आदी साठवण तलावात जलसाठा अद्यापही जोत्याखाली आहे़ तर हळदवाढवणा धरणातील पाणीसाठाही अत्यल्प आहे़ तालुक्यात शंभराहून अधिक पाझर तलाव आहेत, तेही कोरडेच़ तिरू नदी ही कोरडीच असून, नदीकाठी जनावरांचे कळप पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे दिसून येत आहे़ रावणकोळा धरणात पूर्वीचा बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे़ त्या धरणातूनच माळहिप्परगा, रावणकोळा परिसरातील वाडी-तांडे व जळकोट शहरातील नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू केला आहे़ त्यातही नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़ जळकोट शहराला धरणातून पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन त्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, संबंधित जिल्हा परिषद सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत चाचणीही घेण्यात आली़ मात्र पणी जळकोटच्या टाकीत येऊन पोहोचले़ सहा ते सात मोटारी चालल्या़ परंतू, नगरपंचायतीने ही योजना अद्यापही आपल्या ताब्यात घेतली नाही़ सदरील योजनेअंतर्गत मिळणारे पाणी अद्यापही कुलूपबंद प्रक्रियेतच आहेत़ दोन-तीन दिवसापूर्वी शहरात पाणीपुरवठा करण्यात आला होता़ परंतू, सदरील योजना नगरपंचायतीने ताब्यात न घेतल्याने पुन्हा ग्रामस्थांना पणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ पंचायत समिती व तहसील प्रशासनाने टँकर बंद केले़ तसेच नळ योजनेचे पाणीही बंद केले़ त्यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे नगरपंचायतीने ही योजना तात्काळ ताब्यात घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवल्यास नागरिकांना पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांची आहे़ सदरील योजनेअंतर्गत शहराला पुरवठा करण्यात येणारे पाणी दर पंधरा दिवसाला सुटत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ तालुक्यातील उमरदरा, शिवाजीनगर तांडा, फकू्र तांडा या तीन तांड्यावर एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ तर अनेक वाडी-तांड्यावरील जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पशुधनांच्या चाऱ्या-पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ या उमरदरा या गावालाही तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करूनही पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ नगरपंचायतीने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे़