शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पाणीपुरवठ्याचे कोलमडले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:08 IST

वीज वितरण कंपनीने सोमवारपासून शहरातील अनेक भागांत भारनियमन सुरू केल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तोंडचे पाणी पळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वीज वितरण कंपनीने सोमवारपासून शहरातील अनेक भागांत भारनियमन सुरू केल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तोंडचे पाणी पळाले आहे. दिल्लीगेट आणि जिन्सी पाण्याच्या टाक्यांवर दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येत असल्याने जुन्या शहरात पाणीपुरवठा करणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. भारनियमन सुरू असताना पाणीपुरवठा करण्यात येऊ नये अशी मागणी संतप्त नागरिकांकडून मनपाकडे करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे नियोजनच बिघडले आहे.शहराचा पाणीपुरवठा अगोदरच आॅक्सिजनवर सुरू आहे. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड कसेबसे पाणी मिळते. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी जायकवाडीत विजपुरवठा खंडित होतो. तारेवरची कसरत करीत महापालिका नागरिकांची तहान भागवत आहे. सोमवारपासून वीज वितरण कंपनीने अचानकपणे शहरात सकाळी तीन तास, सायंकाळी तीन तास भारनियमन सुरू केले आहे. या भारनियमनाचा फटका महापालिका आणि सर्वसामान्यांना अधिक बसतोय. दिल्लीगेट आणि जिन्सी येथील पाण्याच्या टाकीवर आठ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची लिफ्टिंग बंद आहे. दिल्लीगेट पाण्याच्या टाकीवर ८ वॉर्ड आहेत. एका वॉर्डाची लोकसंख्या जवळपास १० हजार गृहीत धरण्यात येते. जिन्सी टाकीवरही ४ वॉर्डांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. येथील ४० हजार नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या टाक्या भारनियमनातून वगळाव्यात, अशी मागणी मनपा वीज कंपनीकडे करणार आहे. सध्या तरी पाणीपुरवठा विभाग संकटात सापडला आहे.