शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

दोन गटांत तुंबळ हाणामारी

By admin | Updated: June 12, 2014 01:39 IST

वीरेगाव : मागासवर्गीयांच्या ताब्यात असलेल्या रामनगर येथील गायरान जमिनीवर कब्जा करण्यासाठी गेलेल्या गेंदालाल राजाराम झुंगे व इतरांनी केलेल्या हल्ल्यात राजू आढाव नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली.

वीरेगाव : मागासवर्गीयांच्या ताब्यात असलेल्या रामनगर येथील गायरान जमिनीवर कब्जा करण्यासाठी गेलेल्या गेंदालाल राजाराम झुंगे व इतरांनी केलेल्या हल्ल्यात राजू आढाव नामक व्यक्ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, यात एक कुडाच्या झोपडीसह एक जीप व तीन मोटारसायकलीही जाळण्यात आल्या. बुधवारी दुपारी १२.३० वाजेपासून हा प्रकार सुरू होता. मौजपुरी ठाण्याच्या सहायक निरीक्षक मीना कर्डक यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना प्रक्षुब्ध जमावाला आटोक्यात आणताना काठ्या आणि दगडांचा मार सहन करावा लागला. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी तात्काळ विविध पोलिस ठाण्याची कुमक पाठवून परिस्थितीवर नियंत्रणात आणली. रामनगर येथील गायरान जमीन गट क्रमांक २०० मध्ये बाबूराव काळाजी आढाव यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ताबा होता. या जमिनीवर कब्जा करण्यासाठी जालना येथील काही जणांनी बळाचा वापर करून सिमेंटचे पोल रोवण्यास सुरूवात केली. त्याला आढाव कुटुंबाने विरोध केला. त्यावेळी गेंदालाल राजाराम झुंगे, शांतीलाल राजाराम झुंगे, गोविंदलाल राजाराम झुंगे, पवन शांतीलाल झुंगे, कांतीलाल झुंगे, विठ्ठल गणपत पवार, लहूजी गुणाजी पवार यांच्यासह ४० ते ५० जणांनी बाबूराव आढाव यांच्यासह कुटुंबीयांना मारहाण केली. या प्रकाराने तणाव वाढला. दरम्यान, आपल्या कुटुुंबीयांस संबंधितांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आढाव यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीव्दारे म्हटले असून, या हल्ल्यात शेतात सोनाजी थोरात यांच्या मालकीचे कुड व पत्राचे घर जळाल्याने २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. यात राजू आढाव हा तरूण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, मौजपुरी ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कब्जा करण्याचा प्रकार टाळण्यासाठी गेंदालाल झुंगे यांनी एक लाख रूपये खंडणीची मागणी केल्याचे आढाव यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर झुंगे यांनी आपल्या जमिनीवर या कुटुंबीयांनी कब्जा केल्याचे म्हटले. (प्रतिनिधी)तणावानंतर परिस्थिती नियंत्रणातगायरान जमिनीच्या कब्जावरून बुधवारी दुपारी १२.३० वाजेपासून सुरू असलेल्या या तणावाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या हल्ल्यात काही पादचारी व वाहनधारकांना मार खावा लागला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली खरी, परंतु उशिरापर्यंत रामनगर आणि परिसरात तणाव कायम होता. जालना-मंठा मार्गावर बराच वेळपर्यंत वाहतूकही ठप्प झाली होती. या प्रकाराबाबत तर्क-वितर्कांना उधान आले आहे.