शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दीड हजार कुटुंबियांना भाऊबीज भेट

By admin | Updated: November 14, 2015 00:52 IST

बीड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून शिवसेना गोरगरीब कुटुंबियांसाठी पुन्हा एकदा धावून आली.

बीड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून शिवसेना गोरगरीब कुटुंबियांसाठी पुन्हा एकदा धावून आली. शुक्रवारी दीड हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून शिवसेनेने भाऊबीजेची अनोखी भेट दिली.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची विशेष उपस्थिती होती. सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, आ. संजय सिरसाट, अंबादास जानवे, सुधीर पाटील, राजू वैद्य, वैभव पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची यावेळी उपस्थिती होती.दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या पणत्या, साबणापासून ते तेलसाखरेपर्यंतच्या डझनभर वस्तूंचे वाटप दीड हजार जणांना करण्यात आले. एका लाभार्थ्यास साधारणपणे तीन हजार रूपयापर्यंतच्या वस्तू देण्यात आल्या. यावेळी मंत्री कदम यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत शिवसेना पाठीशी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्याला आत्महत्येचा कलंक लागला आहे. तो धुवून काढण्यासाठी शिवसेना यापूर्वी देखील धावून आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर मदतीसाठी लाखोंची रक्कम उभी केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना धीटपणे करावा लागेल. आत्महत्या हा पर्याय नाही. शिवसेना सोबत असताना संकटांना घाबरता कशाला ? असा धीरही त्यांनी दिला. बीड व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी यापुढे देखील प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संकटात सापडलेल्या सोन्यासारख्या माणसांना शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या घरात सेनेचा दीवाबीडमधील शेतकऱ्यांच्या भेटीला अनेकजण हात हलवित आले आणि गेले. प्रत्यक्ष मदत घेऊन फक्त शिवसेना आली, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या घरामध्ये दीवा पेटविण्याचे काम केवळ शिवसेनेने केलेले आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.शिवसेनेची मदत सार्थकीबीडमध्ये भीषण दुष्काळ आहे. मदतीसाठी निवडलेले लाभार्थी आर्थिक खाईत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेने केलेली मदत सार्थकी ठरल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी केले.इतरांना जाणीव नाहीजिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मार्गदर्शन करताना विरोधकांवर टीकेची झोड उठवली. बीडमध्ये मोठे नेते आहेत, मात्र त्यांच्यात दानत नाही. शिवसेना संवेदनशील असून, गोरगरीबांना आधार देण्याचे काम केले आहे. यापुढेही शिवसेनाच मदतीला येईल. (प्रतिनिधी)