शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ, कर्जाचे पैसे जनावरे विकून दे, पण पैसे पचवू नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:39 IST

खोलमारा येथील ईश्वर मदनकर या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत काढलेल्या बँक खात्यातून पैसे काढण्यास निर्बंंध घातल्याने केंद्र शासनाच्या योजनेचे कोडे अधिकाऱ्यांना उलगडत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील ७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा निधी मिळूनही तो काढता येत नसल्याने जनधनचे खाते डोकेदुखी ठरले आहे़ गोरगरिबांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत १ लाख २० हजार रूपयांचे घरकुल बांधून देण्यात येत आहे़ त्यासाठी आॅनलाईन निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे़ पहिल्या हप्ता ३० हजार दुसऱ्या हप्त्यात ६० व शेवटच्या हप्त्यात ३० हजार रूपये बँकेत जमा करण्यात येत आहेत़ जनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी बँकेत खाते काढले आहेत़ या खात्यावरच घरकुलाचा हप्ता जमा होत आहे़ परंतु जनधनच्या बँक खात्यातन केवळ १० हजार रूपयेच काढता येत असल्याने लाभार्थ्यांची कुचंबणा होत आहे़ निधी मिळूनही तो खर्च करता येत नसल्याने घरकुलांचे कामे अर्धवट आहेत़ यासंदर्भात अधिकारीही लाभार्थ्यांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहेत़ दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढण्याची सूचना केली होती़ भारतीय रिझर्व बँकेनेच यासंदर्भात निर्बंध लावल्याने स्थानिक पातळीवर कोणतेही निर्णय घेतले जाऊ शकत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ दोन्ही योजना शासनाच्या असल्या तरी एका योजनेचे पाय दुसऱ्या योजनेत अडकल्याने दोन्ही योजनांचा गुंता कायम आहे़ रिझर्व बँक या संदर्भात निर्णय घेऊ शकते़ त्यासाठी रिझर्व बँकेच्या मुंबई कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांनी शिफारस करणे आवश्यक आहे़ पण असे होत नसल्याने घरकुलाचा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यातच पडून आहे़ यासंदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे यांनी रिझर्व बँकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक नांदेडला बोलावली आहे़ यावेळी हा प्रश्न मांडण्यात येणार आहे़ जि़ प़ ग्रामीण विकास यंत्रणेने यापूर्वीही बँक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन लाभार्थ्यांच्या खात्यातून ३० हजार रूपये काढण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी केली होती़ त्यानुसार लाभार्थ्यांना २० हजार रूपयांपर्यंत खात्यातून पैसे काढता येतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़