शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

भाऊ, कर्जाचे पैसे जनावरे विकून दे, पण पैसे पचवू नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:39 IST

खोलमारा येथील ईश्वर मदनकर या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत काढलेल्या बँक खात्यातून पैसे काढण्यास निर्बंंध घातल्याने केंद्र शासनाच्या योजनेचे कोडे अधिकाऱ्यांना उलगडत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील ७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा निधी मिळूनही तो काढता येत नसल्याने जनधनचे खाते डोकेदुखी ठरले आहे़ गोरगरिबांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत १ लाख २० हजार रूपयांचे घरकुल बांधून देण्यात येत आहे़ त्यासाठी आॅनलाईन निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे़ पहिल्या हप्ता ३० हजार दुसऱ्या हप्त्यात ६० व शेवटच्या हप्त्यात ३० हजार रूपये बँकेत जमा करण्यात येत आहेत़ जनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी बँकेत खाते काढले आहेत़ या खात्यावरच घरकुलाचा हप्ता जमा होत आहे़ परंतु जनधनच्या बँक खात्यातन केवळ १० हजार रूपयेच काढता येत असल्याने लाभार्थ्यांची कुचंबणा होत आहे़ निधी मिळूनही तो खर्च करता येत नसल्याने घरकुलांचे कामे अर्धवट आहेत़ यासंदर्भात अधिकारीही लाभार्थ्यांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहेत़ दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढण्याची सूचना केली होती़ भारतीय रिझर्व बँकेनेच यासंदर्भात निर्बंध लावल्याने स्थानिक पातळीवर कोणतेही निर्णय घेतले जाऊ शकत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ दोन्ही योजना शासनाच्या असल्या तरी एका योजनेचे पाय दुसऱ्या योजनेत अडकल्याने दोन्ही योजनांचा गुंता कायम आहे़ रिझर्व बँक या संदर्भात निर्णय घेऊ शकते़ त्यासाठी रिझर्व बँकेच्या मुंबई कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांनी शिफारस करणे आवश्यक आहे़ पण असे होत नसल्याने घरकुलाचा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यातच पडून आहे़ यासंदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे यांनी रिझर्व बँकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक नांदेडला बोलावली आहे़ यावेळी हा प्रश्न मांडण्यात येणार आहे़ जि़ प़ ग्रामीण विकास यंत्रणेने यापूर्वीही बँक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन लाभार्थ्यांच्या खात्यातून ३० हजार रूपये काढण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी केली होती़ त्यानुसार लाभार्थ्यांना २० हजार रूपयांपर्यंत खात्यातून पैसे काढता येतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़