शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

भाऊ अजिबात चिंता करायची नाही, आम्ही सगळे तुमच्याच पाठीमागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:03 IST

उंडणगाव : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात असून प्रचार थंडावला आहे. उमेदवारांनी निवडून येण्यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे वॉर्डातील प्रत्येक ...

उंडणगाव : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात असून प्रचार थंडावला आहे. उमेदवारांनी निवडून येण्यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे वॉर्डातील प्रत्येक घर पिंजून काढून आश्वासनांची खैरात वाटली. त्यांचे हे दररोजचे आश्वासनांचे तुणतुणे पाहून मतदारही हुशार झाल्याचे दिसून आले. तेही आता ‘भाऊ, तुम्ही अजिबात चिंता करू नका, आम्ही सगळे तुमच्याच पाठीमागे आहोत’ असे आश्वासन देत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून आले.

सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. जसजशी निवडणूक जवळ येत गेली, तसतशी प्रचारात मोठी रंगत चढत गेल्याचे दिसत आहे. बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यापूर्वी दररोज उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करीत होते. सकाळी सकाळीच टपकलेल्या उमेदवारांना मतदारही आता, भाऊ, चिंता करू नका. आमचे मतदान तुम्हालाच, म्हणून वाटी लावताना दिसत होते. घरी येणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी हे वाक्य उच्चारले जात असल्यामुळे मतदान नक्की कोणाला करणार, हे १५ तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे.

चौकट

निवडून येण्यासाठी विविध क्लुप्त्या

विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकींपेक्षाही ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची असते. यात गावाच्या पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळे निवडून येण्यासाठी सगळेच हातखंडे वापरले जातात. कोणी खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, भावकीसह नात्यागोत्यांचीही यावेळी चांगलीच कसोटी लागलेली असते.