शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

३१६ योजनांचा बट्टयाबोळ

By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST

संजय कुलकर्णी ,जालना भारत निर्माण, जलस्वराज्य आणि राष्ट्रीय पेयजल अशा विविध नावांनी ग्रामीण भागात कायमस्वरूपी योजनांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा

संजय कुलकर्णी ,जालनाभारत निर्माण, जलस्वराज्य आणि राष्ट्रीय पेयजल अशा विविध नावांनी ग्रामीण भागात कायमस्वरूपी योजनांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर बट्टयाबोळ झाला आहे. योजनाच अपूर्ण राहिल्याने आता त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा सुधारित दरानुसार अधिक निधी लागणार, त्यामुळे अगोदर खर्च केलेला निधी पाण्यातच गेला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत २०११-१२ मध्ये ७४, २०१२-१३ मध्ये ८६ आणि २०१३-१४ मध्ये ८३ गावे व वाड्यांमध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा नळयोजनांना मंजुरी देण्यात आली. यात जालना ४०, बदनापूर १८, अंबड ४९, घनसावंगी ३८, परतूर ११, मंठा १९, भोकरदन ४० आणि जाफराबाद २८ अशा एकूण २४३ योजनांचा समावेश आहे. यामध्ये केवळ ४५ योजनांचे काम पूर्ण होऊन त्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय पेयजलच्या १९८ योजना अपूर्णच आहेत. शिवाय भारत निर्माण व जलस्वराज्यच्या १२१ योजनाही अपूर्ण आहेत. पेयजलच्या अपूर्ण योजनांमध्ये समितीच्या गाव अंतर्गत वादामुळे १९, उद्भव अपुरा असल्याने ९, विद्युत जोडणीअभावी ८, वितरण व्यवस्था अपूर्ण असल्याने ६५, जलकुंभाचे काम अपुर्ण असल्याने ३७, लोकवर्गणी न भरल्याने ४ तर भौतिकदृष्ट्या पूर्ण केलेल्या ५६ योजना अंतिम करण्याअभावी अपूर्ण आहेत. अपूर्ण योजनांपैकी बहुतांश योजना गाव पातळीवरील वादामुळे तसेच पाणीपुरवठा समितीमधील असमन्वयामुळे रखडल्याचे सांगण्यात येते. ३६ योजनांचा शिलकीमध्ये राहिलेला खर्च परत न केल्याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधित समित्यांच्या अध्यक्ष, सचिवांना नोटिसा बजावल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अपूर्ण कामांसंबंधी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या कामांचे मूल्यांकन होणे आता गरजेचे भासू लागल्याचे काही सदस्यांनीच सांगितले. दिलेली देयके, झालेल्या कामांचे मोजमाप, दिलेल्या मुदतवाढी, वाढीव दराने दिलेल्या पुनर्मान्यता या सर्व बाबींकडे लक्ष दिले तरच जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळा कमी होतील, असा अंदाज जाणकारांमार्फत व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे. (समाप्त) ४यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची प्राथमिक जबाबदारी त्या त्या ठिकाणच्या पाणीपुरवठा समित्यांची आहे. आम्ही त्यांचा पाठपुरावा करीत आहोत.