शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

२३ शाळांत बोगस आहार

By admin | Updated: October 27, 2015 00:26 IST

लातूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दुष्काळाच्या विषयाला बगल देत विविध विषयावर चर्चा झाली़

लातूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दुष्काळाच्या विषयाला बगल देत विविध विषयावर चर्चा झाली़ परंतु पोषण आहारासाठी येणाऱ्या वस्तू खराब असल्याचे लातूर तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद शाळेत आढळून आल्याने या विषयावर सर्वसाधारण सभेत पोषण आहाराचा विषय गाजला असून, या पोषण आहाराची चौकशी करुन त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला आहे़ जिल्हा परिषदेचे वार्षिक सर्वसाधारण सभा झाली़ या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, जि़प़ उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांच्यासह विविध विभागाच्या सभापतींची उपस्थिती होती़ यावेळी सवई यांनी पथदिव्याच्या कामांच्या चौकशीची मागणी केली़ दुष्काळी परिस्थिती असतानाही सभापतींना नवीन गाड्यांची मागणी करण्यात आली व या गाड्यांसाठी १० चालकांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचाही निर्णय घेण्यात आला़ तसेच नळेगाव ते उकाची वाडी येथील कामाची चौकशी, तिर्थक्षेत्राचा दर्जा याबाबत चर्चा करुन नळेगावच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला़ तसेच महिला व बालकल्याण विभागात विभागांतर्गत दिलेल्या बोगस प्रशिक्षणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या बरोबरच लातूर तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ठ दर्जाची तूर दाळ, मसुर दाळ, तांदुळ आढळून आला़ त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर वर्षाकाठी ३५ कोटींचा खर्च केला जातो आणि दुसरीकडे शासनामार्फत खाजगी एजन्सीला कंत्राट देऊन कसल्याही पोषण आहाराच्या वस्तू विद्यार्थ्यांच्या आहारात वापरल्या जात असल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे या विषयावर सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला़ माजी जि़प़ अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी सूचक म्हणून पोषण आहाराबाबत भूमिका मांडली़ तर जि़ प़ सदस्य भरत गोरे व रामचंद्र तिरुके यांनी यातील दोषी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली़ काही सदस्यांनी एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली़ दीड ते दोन तास झालेल्या गोंधळानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर पद्धतीने या बाबतचा अहवाल शासनाकडे पाठवू, असे आश्वासन दिले़ त्यानंतरच पोषण आहाराचा विषय थांबला़जळकोट तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट पोषण आहार, औसा तालुक्यातील गोंद्री येथील जिल्हा परिषद शाळेतील निकृष्ट आहाराच्या प्रकारानंतर लातूर तालुक्यातील पेठ येथील जिल्हा परिषद शाळेतही निकृष्ट पोषण आहारामध्ये निकृष्ट मसूर दाळ, तूर दाळ, तांदुळ आदी वस्तू आढळून आल्या आहेत़ त्यामुळे या पोषण आहाराची चौकशी करुन यातील दोषी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सभागृहात बहुमताने करण्यात आली़ ४स्वच्छ व सुंदर जिल्हा परिषद असल्याचे स्वप्न दाखविणाऱ्या जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशीच पाणी नसल्याने गोंधळ उडाला़ सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी विषय उचलताच त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी स्वच्छतेची कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काम न केल्यास पगार बंद करा, असा आदेश संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याने कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे़