शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पालिकेच्या घंटागाड्या झाल्या गायब?

By admin | Updated: June 2, 2014 00:53 IST

जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच घंटागाड्याही गायब झाल्या असल्याने शहरातील विविध भागांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजा-वाजा करीत घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. नवीन जालना भागातील स्वच्छतेचे कंत्राट खाजगी एजन्सीला देण्यात आले. सोसायटीला बहाल केलेल्या कामाची मुदत संपली आहे. नवीन जालना भागातील फुलबाजार, कपडाबाजार, फुले मार्केट, सिंधीबाजार, सराफा रोड, टांगा स्टॅण्ड-मामा चौक या भागात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घंटागाडी धावणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत पालिकेच्या घंटागाड्या फिरकल्या नाहीत. दरम्यान, दोन आठवड्यात संपूर्ण नवीन जालना स्वच्छ व सुंदर होईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र ते सर्वांच्या विस्मृतीत गेले. कधीकधी जुना जालना भागात घंटागाड्या येत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गाड्या येत नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. या भागात सफाई कर्मचारी वळविण्यात आले होते. मात्र, तेही नियमितपणे सफाई करीत नाहीत, अशी ओरड होत आहे. मान्सूनपूर्व कामे हाती घेत पालिकेने या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र, नाल्यांमधील घाण रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते अडचणीचे ठरत आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील केर-कचरा टाकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाड्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात फिरकलेल्याच नाहीत, असे विदारक चित्र आहे. त्यामुळे शहराची अवस्था कचराकुंडीसारखीच झाली आहे. दरम्यान, पालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून शहरातील प्रतिष्ठित आणि सुजाण नागरिकांनीच स्वच्छतेविषयी पुढाकार घेतला. ‘सिटीजन्स फॉर सिटीजन’ या संस्थेने रविवारी रॅली काढून नागरिकांनीच आप-आपल्या घरातील कचर्‍याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) सफाईची मागणी पालिकेने मान्सूनपूर्व सफाईची कामे हाती घेतली आहेत. यात नाल्यांची सफाई होतांना दिसत आहे. मात्र, शहरातील कचराकुंड्यांवरील घाण साफ करावी, जेणे करून पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही, अशी मागणी होत आहे.