शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

पालिकेच्या घंटागाड्या झाल्या गायब?

By admin | Updated: June 2, 2014 00:53 IST

जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जालना : खाजगी एजन्सीच्या त्रांगड्यामध्ये शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच घंटागाड्याही गायब झाल्या असल्याने शहरातील विविध भागांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजा-वाजा करीत घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. नवीन जालना भागातील स्वच्छतेचे कंत्राट खाजगी एजन्सीला देण्यात आले. सोसायटीला बहाल केलेल्या कामाची मुदत संपली आहे. नवीन जालना भागातील फुलबाजार, कपडाबाजार, फुले मार्केट, सिंधीबाजार, सराफा रोड, टांगा स्टॅण्ड-मामा चौक या भागात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घंटागाडी धावणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत पालिकेच्या घंटागाड्या फिरकल्या नाहीत. दरम्यान, दोन आठवड्यात संपूर्ण नवीन जालना स्वच्छ व सुंदर होईल, असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र ते सर्वांच्या विस्मृतीत गेले. कधीकधी जुना जालना भागात घंटागाड्या येत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गाड्या येत नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. या भागात सफाई कर्मचारी वळविण्यात आले होते. मात्र, तेही नियमितपणे सफाई करीत नाहीत, अशी ओरड होत आहे. मान्सूनपूर्व कामे हाती घेत पालिकेने या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र, नाल्यांमधील घाण रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते अडचणीचे ठरत आहेत. नागरिकांनी आपल्या घरातील केर-कचरा टाकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाड्या अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात फिरकलेल्याच नाहीत, असे विदारक चित्र आहे. त्यामुळे शहराची अवस्था कचराकुंडीसारखीच झाली आहे. दरम्यान, पालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून शहरातील प्रतिष्ठित आणि सुजाण नागरिकांनीच स्वच्छतेविषयी पुढाकार घेतला. ‘सिटीजन्स फॉर सिटीजन’ या संस्थेने रविवारी रॅली काढून नागरिकांनीच आप-आपल्या घरातील कचर्‍याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी) सफाईची मागणी पालिकेने मान्सूनपूर्व सफाईची कामे हाती घेतली आहेत. यात नाल्यांची सफाई होतांना दिसत आहे. मात्र, शहरातील कचराकुंड्यांवरील घाण साफ करावी, जेणे करून पावसाळ्यात रोगराई पसरणार नाही, अशी मागणी होत आहे.