शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

क्षुल्लक वादातून एकाचा खून

By admin | Updated: May 24, 2014 01:39 IST

जालना - शेजार्‍याशी झालेल्या क्षुल्लक वादातून विठ्ठलसिंग राजपूत यांना चौघांनी घरातून ओढत आणून तीक्ष्ण हत्यार, पाईप व काठीने मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केला.

जालना - शेजार्‍याशी झालेल्या क्षुल्लक वादातून विठ्ठलसिंग राजपूत यांना चौघांनी घरातून ओढत आणून तीक्ष्ण हत्यार, पाईप व काठीने मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केला. ही घटना गुरूवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जुना जालन्यातील साळी गल्ली परिसरात घडली. नंतर मुख्य आरोपी स्वत:हून ठाण्यात हजर झाला. उर्वरित तिघांना पोलिसांनी अटक केली. राजपूत हे एका साप्ताहिकाचे पत्रकार होते. राजपूत हे घरात असताना चार जणांनी त्यांच्यावर शस्त्रास्त्रांनी हल्ला केला. मात्र सुरूवातीला या हल्ल्यातून बचाव करून राजपूत यांनी गल्लीतून पळ काढला. साळी गल्ली भागातील पथदिवे बंद असल्याने हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला नाही. जवळपास अर्धा कि़मी.अंतर पळून गेल्यानंतर मित्र कैलास सीताराम शिंदे यांच्या गवळी मोहल्ला भागातील घरात विठ्ठलसिंग राजपूत यांनी आश्रय घेतला. मात्र हल्लेखोरांनी पाठलाग करून शिंदे यांचे घर गाठले व ‘राजपूत यांना घराबाहेर पाठवा, नाही तर हल्ला करूत,’ अशी धमकी दिली. त्यावेळी राजपूत यांनी मागच्या दाराने पळ काढला. ते आरोपींनी पाहिले व जनता शाळेच्या जवळच राजपूत यांना पकडले. राजपूत यांनी प्रतिकार म्हणून सुनील सोनारला (१९) धक्का मारल्याने तो खाली पडला. त्यामुळे शेख अन्वर शेख बाबरने (२१) राजपूतवर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. अन्य दोघे जण अकबरखान युसूफखान (२४) व नितीन मदन हेलगट (२०) यांनी पाईप, काठीने हल्ला केला. राजपूत यांना डोके, छाती, पोटावर खोलवर जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला. कदीम जालना पोलिसांना कैलास शिंदे यांनी दूरध्वनीवरून कळविल्याने पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार हे घटनास्थही पथकासह हजर झाले. जमादार पिंपळे यांनी नोंद घेतली.गुरूवारी रात्री उशिरा कदीम जालना पोलिस ठाण्यात आनंदीस्वामी गल्ली येथील कैलास सीताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून सुनील रामेश्वर सोनार (साळी गल्ली), शेख अनवर शेख बाबर, अकबरखान युसूफखान (दु:खीनगर) व नितीन मदन हेलगट (शिशटेकडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी सुनील सोनार हा स्वत:हून ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना घटनेची कबुली दिली.