शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर भाजपचे उपोषण मागे

By | Updated: December 4, 2020 04:08 IST

फुलंब्री - तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोहित्र जळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. हे ...

फुलंब्री - तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोहित्र जळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. हे रोहित्र तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने बुधवारी महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेत लवकरच समस्या सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यंदा पाऊस चांगला झाल्याने रबीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी पिकाची पेरणी केली. यात गव्हाची पेरणी चांगली आहे. रबी पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना दुसरीकडे तालुक्यातील बहुतांश शिवारातील रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पिकाला पाणी देणे शक्य होईना. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हाच मुद्दा घेत भाजपच्या वतीने जळालेले रोहित्र त्वरित दुरुस्त व बदलून देण्यात यावे, अशी मागणी करीत महावितरणकडे केली होती. अन्यथा, आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला.

बुधवारी भाजपच्या वतीने अखेर महावितरणला जागे करण्यासाठी उपोषण केले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. एम. काळे व उपअभियंता अरुण गायकवाड यांनी बंद पडलेले रोहित्र येत्या आठ दिवसांत बदलून देण्यात येतील, असे आश्वासित केले. आ. हरीभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करीत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अखेर उपोषण मागे घेण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, जि.प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, सर्जेराव मेटे, बाळासाहेब तांदळे, गजानन नागरे, योगेश मिसाळ, राम बनसोड, रामेश्वर चोपडे, मयूर कोलते, वाल्मिक जाधव, अजय शेरकर, एकनाथ ढोके, सुमित प्रधान,रवींद्र काथार, भगवान निराशे, कृष्णा पाथ्रे,अजय नागरे, आकाश गोरावने, गणेश नागरे, आबासाहेब फुके, अरुण तुपे, सांडू हापत, गुलाब पटेल, योगेश म्हस्के उपोषणात सहभागी झाले होते.

फोटो कॅप्शन - भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी सुरू केलेले उपोषण सोडविताना आ. हरिभाऊ बागडे, महावितरणचे अधिकारी आर. एम. काळे, अरुण गायकवाड आदी.