शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
4
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
5
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
6
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
10
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
11
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
12
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
13
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
14
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
15
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
16
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
17
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
18
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
19
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
20
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

भाजपानेच घातली नांदेडच्या विकासाला आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:39 IST

काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांना नांदेडच्या विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी खेचून आणत त्यांनी शहराच्या विकासाला मोठी गती दिली. त्यामुळेच आज नांदेडचा चेहरामोहरा बदलताना दिसतो आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा शाश्वत सोयी निर्माण करण्याचा काँग्रेस कार्यकाळात प्रामाणिक प्रयत्न झाला. सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी इलिचपूर, बोंढार प्रकल्प सुरू करण्यात आले तर आसना प्रगतीपथावर आहे. इलिचपूरमधून शेतकºयांना पाणी उपलब्ध झाले आहे तर बोंढारचे पाणी प्रक्रिया करुन गोदावरीत सोडले जाते. शहराच्या सर्वांगिण विकासासाठीही विविध योजनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आले. मात्र काँग्रेसने सुरू केलेली ही नांदेडच्या विकासाची चळवळ भाजप सरकारच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शहरातील दलित वस्ती सुधारणेसाठी मनपाला २६ कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. हा निधी नांदेडसाठी वितरीतही करण्यात आला. मात्र तो प्रत्यक्ष मनपाच्या खात्यावर वर्ग न होता जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत राहिला आणि शेवटी सरकारकडे परत गेला. हा निधी भाजपा सरकारने प्रामाणिकपणे नांदेडकरांना दिला असता तर शहरातील दलित वस्त्यांमध्ये अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. भाजपाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे ते होवू शकले नाही. याबाबत आ. अमिता चव्हाण यांनी विधी मंडळातही याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सदर निधी नांदेडला पुन्हा देण्याचा शब्द दिला होता. मात्र सरकारची तीन वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशाच सुडबुद्धीचे राजकारण भाजपा सरकारने स्मार्ट सिटी योजनेमध्येही केले आहे. या योजनेच्या सर्व निकषामध्ये नांदेड शहर बसते. मात्र नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असल्याने या योजनेतूनही सरकारने नांदेडला वगळले. मुंबई-नांदेड रेल्वेबाबतही हाच अनुभव आहे. लातूरहून पुढे नांदेडसाठी रेल्वेला हिरवा कंदील मिळालेला असतानाही ती रोखण्याचे काम भाजपाच्याच मंत्र्यांनी केले. तेच आता महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची धुरा सांभाळत आहेत. नांदेडकर जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आयुक्तालयाचा मुद्दाही लोंढे यांनी यावेळी उपस्थित केला. मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. विविध अहवालही नांदेडलाच स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, असे अनुकुल असताना लातूरकरांनी म्हणजेच भाजपाचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यात खोडा घातल्याचा आरोप लोंढे यांनी केला. विकास कामामध्ये कसले पक्षीय राजकारण करता असा सवाल करीत नांदेडकर जनतेचा अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसवर विश्वास आहे. या निवडणुकीतही मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवून नांदेडमधील मतदार हा ऋणानुबंध कायम ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.