शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानेच घातली नांदेडच्या विकासाला आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:39 IST

काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांना नांदेडच्या विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी खेचून आणत त्यांनी शहराच्या विकासाला मोठी गती दिली. त्यामुळेच आज नांदेडचा चेहरामोहरा बदलताना दिसतो आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा शाश्वत सोयी निर्माण करण्याचा काँग्रेस कार्यकाळात प्रामाणिक प्रयत्न झाला. सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी इलिचपूर, बोंढार प्रकल्प सुरू करण्यात आले तर आसना प्रगतीपथावर आहे. इलिचपूरमधून शेतकºयांना पाणी उपलब्ध झाले आहे तर बोंढारचे पाणी प्रक्रिया करुन गोदावरीत सोडले जाते. शहराच्या सर्वांगिण विकासासाठीही विविध योजनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आले. मात्र काँग्रेसने सुरू केलेली ही नांदेडच्या विकासाची चळवळ भाजप सरकारच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शहरातील दलित वस्ती सुधारणेसाठी मनपाला २६ कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. हा निधी नांदेडसाठी वितरीतही करण्यात आला. मात्र तो प्रत्यक्ष मनपाच्या खात्यावर वर्ग न होता जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत राहिला आणि शेवटी सरकारकडे परत गेला. हा निधी भाजपा सरकारने प्रामाणिकपणे नांदेडकरांना दिला असता तर शहरातील दलित वस्त्यांमध्ये अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. भाजपाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे ते होवू शकले नाही. याबाबत आ. अमिता चव्हाण यांनी विधी मंडळातही याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सदर निधी नांदेडला पुन्हा देण्याचा शब्द दिला होता. मात्र सरकारची तीन वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशाच सुडबुद्धीचे राजकारण भाजपा सरकारने स्मार्ट सिटी योजनेमध्येही केले आहे. या योजनेच्या सर्व निकषामध्ये नांदेड शहर बसते. मात्र नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असल्याने या योजनेतूनही सरकारने नांदेडला वगळले. मुंबई-नांदेड रेल्वेबाबतही हाच अनुभव आहे. लातूरहून पुढे नांदेडसाठी रेल्वेला हिरवा कंदील मिळालेला असतानाही ती रोखण्याचे काम भाजपाच्याच मंत्र्यांनी केले. तेच आता महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची धुरा सांभाळत आहेत. नांदेडकर जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आयुक्तालयाचा मुद्दाही लोंढे यांनी यावेळी उपस्थित केला. मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. विविध अहवालही नांदेडलाच स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, असे अनुकुल असताना लातूरकरांनी म्हणजेच भाजपाचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यात खोडा घातल्याचा आरोप लोंढे यांनी केला. विकास कामामध्ये कसले पक्षीय राजकारण करता असा सवाल करीत नांदेडकर जनतेचा अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसवर विश्वास आहे. या निवडणुकीतही मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवून नांदेडमधील मतदार हा ऋणानुबंध कायम ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.