शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

भाजपानेच घातली नांदेडच्या विकासाला आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:39 IST

काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात पक्षाचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहराच्या चौफेर विकासाला गती देण्यात आली. मात्र केवळ सुडबुद्धीच्या राजकारणापोटी भाजपाकडून नांदेडच्या विकासाला अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. भाजपा सरकारमुळेच काँग्रेसच्या काळात मनपासाठी जाहीर झालेला २६ कोटीचा निधीही परत गेल्याचा आरोपही लोंढे यांनी यावेळी केला.माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांना नांदेडच्या विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी खेचून आणत त्यांनी शहराच्या विकासाला मोठी गती दिली. त्यामुळेच आज नांदेडचा चेहरामोहरा बदलताना दिसतो आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा शाश्वत सोयी निर्माण करण्याचा काँग्रेस कार्यकाळात प्रामाणिक प्रयत्न झाला. सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी इलिचपूर, बोंढार प्रकल्प सुरू करण्यात आले तर आसना प्रगतीपथावर आहे. इलिचपूरमधून शेतकºयांना पाणी उपलब्ध झाले आहे तर बोंढारचे पाणी प्रक्रिया करुन गोदावरीत सोडले जाते. शहराच्या सर्वांगिण विकासासाठीही विविध योजनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आले. मात्र काँग्रेसने सुरू केलेली ही नांदेडच्या विकासाची चळवळ भाजप सरकारच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शहरातील दलित वस्ती सुधारणेसाठी मनपाला २६ कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. हा निधी नांदेडसाठी वितरीतही करण्यात आला. मात्र तो प्रत्यक्ष मनपाच्या खात्यावर वर्ग न होता जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत राहिला आणि शेवटी सरकारकडे परत गेला. हा निधी भाजपा सरकारने प्रामाणिकपणे नांदेडकरांना दिला असता तर शहरातील दलित वस्त्यांमध्ये अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. भाजपाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे ते होवू शकले नाही. याबाबत आ. अमिता चव्हाण यांनी विधी मंडळातही याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी सदर निधी नांदेडला पुन्हा देण्याचा शब्द दिला होता. मात्र सरकारची तीन वर्षे उलटली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशाच सुडबुद्धीचे राजकारण भाजपा सरकारने स्मार्ट सिटी योजनेमध्येही केले आहे. या योजनेच्या सर्व निकषामध्ये नांदेड शहर बसते. मात्र नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असल्याने या योजनेतूनही सरकारने नांदेडला वगळले. मुंबई-नांदेड रेल्वेबाबतही हाच अनुभव आहे. लातूरहून पुढे नांदेडसाठी रेल्वेला हिरवा कंदील मिळालेला असतानाही ती रोखण्याचे काम भाजपाच्याच मंत्र्यांनी केले. तेच आता महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची धुरा सांभाळत आहेत. नांदेडकर जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आयुक्तालयाचा मुद्दाही लोंढे यांनी यावेळी उपस्थित केला. मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वात मोठे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. विविध अहवालही नांदेडलाच स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, असे अनुकुल असताना लातूरकरांनी म्हणजेच भाजपाचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यात खोडा घातल्याचा आरोप लोंढे यांनी केला. विकास कामामध्ये कसले पक्षीय राजकारण करता असा सवाल करीत नांदेडकर जनतेचा अशोकराव चव्हाण आणि काँग्रेसवर विश्वास आहे. या निवडणुकीतही मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवून नांदेडमधील मतदार हा ऋणानुबंध कायम ठेवतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.