शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

सावधान.., तुमचा उपवास मोडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 23:57 IST

औरंगाबाद : आपण भक्तिभावाने उपवास व फराळामध्ये भगर खात असाल तर सावधान. कारण भगरीऐवजी तुमच्या ताटात तांदूळचुरीचा भात वाढलेला असू शकतो.

औरंगाबाद : आपण भक्तिभावाने उपवास व फराळामध्ये भगर खात असाल तर सावधान. कारण भगरीऐवजी तुमच्या ताटात तांदूळचुरीचा भात वाढलेला असू शकतो. हे वाचून आपणास धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे, बाजारात हलक्या प्रतीच्या भगरीमध्ये तांदळाच्या चुरीची भेसळ केली जात आहे. बाजारभावापेक्षा किलोमागे २४ रुपयांनी स्वस्तही भगर मिळत असल्याने ग्राहकही ती खरेदी करीत आहेत. भेसळयुक्त भगरीबद्दल असलेल्या अज्ञानामुळे तुमचा उपवास न कळत मोडू शकतो. आषाढाला सुरुवात झाली आहे. चातुर्मासालाही येत्या काळात सुरुवात होईल. या काळात उपवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. उपवासासाठी साबुदाण्याप्रमाणेच भगरीचाही खप मोठ्या प्रमाणात होत असतो. सध्या भगरीचे भाव ८८ रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.यात सुटी भगर ७६ ते ७८ रुपये तर पॅकिंगमधील भगर ७६ ते ८८ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. मात्र मागील आठवडाभरापासून शहरात काही विके्रते गल्लोगल्ली फिरून व आठवडी बाजारात बसून अवघ्या ६० रुपये किलोने भगर विकत आहेत. दुकानदाराकडे ८४ रुपये किलो मिळणारी भगर कोणी ६० रुपयांनी देत असेल तर कोणालाही खरेदीचा मोह पडणारच.