शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

दूषित पाण्यापासून सावधान

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत.

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावतात. यासाठी या मोसमात पाणी गाळून आणि उकळून प्यायला हवे. शिवाय या दिवसांत शिळे अन्न खाणे व वारंवार भिजत राहणेही आजाराला निमंत्रण देते.पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे आजार वाढतात कॉलरा, टायफाईडसारख्या आजारामध्ये भर पडते, म्हणूनच पाणी उकळून आणि गाळून घेण्याच्या सूचना डॉक्टर देत असतात. घराघरातून प्रत्येक गृहिणी या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत असतात. तरी गढूळ पाणायामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो. फक्त पाणी प्यायल्यामुळेच आजारांना तोंड द्यावे लागते. असे अजिबात नाही. तर पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळेही सर्दी, खोकला, ताप, येऊन अनेकांना अंथरुण धरावे लागते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे स्किन इन्फेक्शन होणे, अ‍ॅलर्जी अशाही समस्या उद्भवतात. इतर ऋतूप्रमाणे पावसाळ््यातही स्वच्छ पाणीपुरवठा होत असला तरी पाणी भरताना, साठवताना आणि पितांना या तीनपैकी कोणत्यातही एका बाबतीत निष्काळजीपणा झाल्याने पाणी दूषित होते. यासाठी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.डासांपासून सावध रहा पावसाळ््यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. अशा पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची अधिक पैदास होते.त्यामुळे या काळात मलेरिया,डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येते.याशिवाय स्किन इन्फेक्शनच्या समस्यासुद्धा अधिक प्रमाणात वाढतात. दूषित पाण्यामुळे जुलाब, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपिटायटीस असे आजार उद्भवतात. गर्भवती स्त्रियांमध्ये हेपिटायटीस ई होण्याची शक्यता अधिक असते. सर्दी आणि खोकला हे आजार बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.महत्त्वाच्या टिप्सज्या भांड्यात आधी पाणी भरले, तेच भांडे न धुऊन घेता पुन्हा त्यात पाणी भरणे किंवा वॉश बेसिन तसेच टॉयलेटजवळ पाणी साठवून ठेवणे, यामुळे पाण्यातून इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते़ म्हणून आधीच पाणी भरलेल्या भांड्यात पुन्हा पाणी भरु नका़पिण्याचे पाणी माठातून किंवा टाकीतून घेताना थेट ग्लास त्यात बुडवू नका़ खाता-पिताना हात स्वच्छ धुतलेले असतील, याची काळजी घ्या़ बाहेरुन स्वच्छ पाणी आले, तरी सोसायटीच्या टाक्यांमध्ये आजूबाजूला साचलेले पावसाचे खराब पाणी मिक्स होण्याचीही शक्यता असते म्हणूनच सोसायटीच्या टाकीत असे पाणी जाणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते़आजार आणि लक्षणेटायफाईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे, डोकेदुखी़हेपिटायटीस ए आणि ई -डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, उलटी झाल्यासारखे वाटणे, बारीक ताप येणे़गॅस्ट्रो, डायरिया : उलटी होणे, जुलाब होणे. अशी घ्या काळजी...बाहेरचे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये जेवताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत़पाणी गाळून आणि उकळून प्यावे, फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावेत.भाज्या नीट धुऊन, उकळून घ्या़बाथरुममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्या.