शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यापासून सावधान

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत.

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावतात. यासाठी या मोसमात पाणी गाळून आणि उकळून प्यायला हवे. शिवाय या दिवसांत शिळे अन्न खाणे व वारंवार भिजत राहणेही आजाराला निमंत्रण देते.पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे आजार वाढतात कॉलरा, टायफाईडसारख्या आजारामध्ये भर पडते, म्हणूनच पाणी उकळून आणि गाळून घेण्याच्या सूचना डॉक्टर देत असतात. घराघरातून प्रत्येक गृहिणी या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत असतात. तरी गढूळ पाणायामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो. फक्त पाणी प्यायल्यामुळेच आजारांना तोंड द्यावे लागते. असे अजिबात नाही. तर पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळेही सर्दी, खोकला, ताप, येऊन अनेकांना अंथरुण धरावे लागते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे स्किन इन्फेक्शन होणे, अ‍ॅलर्जी अशाही समस्या उद्भवतात. इतर ऋतूप्रमाणे पावसाळ््यातही स्वच्छ पाणीपुरवठा होत असला तरी पाणी भरताना, साठवताना आणि पितांना या तीनपैकी कोणत्यातही एका बाबतीत निष्काळजीपणा झाल्याने पाणी दूषित होते. यासाठी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.डासांपासून सावध रहा पावसाळ््यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. अशा पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची अधिक पैदास होते.त्यामुळे या काळात मलेरिया,डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येते.याशिवाय स्किन इन्फेक्शनच्या समस्यासुद्धा अधिक प्रमाणात वाढतात. दूषित पाण्यामुळे जुलाब, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपिटायटीस असे आजार उद्भवतात. गर्भवती स्त्रियांमध्ये हेपिटायटीस ई होण्याची शक्यता अधिक असते. सर्दी आणि खोकला हे आजार बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.महत्त्वाच्या टिप्सज्या भांड्यात आधी पाणी भरले, तेच भांडे न धुऊन घेता पुन्हा त्यात पाणी भरणे किंवा वॉश बेसिन तसेच टॉयलेटजवळ पाणी साठवून ठेवणे, यामुळे पाण्यातून इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते़ म्हणून आधीच पाणी भरलेल्या भांड्यात पुन्हा पाणी भरु नका़पिण्याचे पाणी माठातून किंवा टाकीतून घेताना थेट ग्लास त्यात बुडवू नका़ खाता-पिताना हात स्वच्छ धुतलेले असतील, याची काळजी घ्या़ बाहेरुन स्वच्छ पाणी आले, तरी सोसायटीच्या टाक्यांमध्ये आजूबाजूला साचलेले पावसाचे खराब पाणी मिक्स होण्याचीही शक्यता असते म्हणूनच सोसायटीच्या टाकीत असे पाणी जाणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते़आजार आणि लक्षणेटायफाईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे, डोकेदुखी़हेपिटायटीस ए आणि ई -डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, उलटी झाल्यासारखे वाटणे, बारीक ताप येणे़गॅस्ट्रो, डायरिया : उलटी होणे, जुलाब होणे. अशी घ्या काळजी...बाहेरचे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये जेवताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत़पाणी गाळून आणि उकळून प्यावे, फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावेत.भाज्या नीट धुऊन, उकळून घ्या़बाथरुममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्या.