शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

दूषित पाण्यापासून सावधान

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत.

नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावतात. यासाठी या मोसमात पाणी गाळून आणि उकळून प्यायला हवे. शिवाय या दिवसांत शिळे अन्न खाणे व वारंवार भिजत राहणेही आजाराला निमंत्रण देते.पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे आजार वाढतात कॉलरा, टायफाईडसारख्या आजारामध्ये भर पडते, म्हणूनच पाणी उकळून आणि गाळून घेण्याच्या सूचना डॉक्टर देत असतात. घराघरातून प्रत्येक गृहिणी या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत असतात. तरी गढूळ पाणायामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो. फक्त पाणी प्यायल्यामुळेच आजारांना तोंड द्यावे लागते. असे अजिबात नाही. तर पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळेही सर्दी, खोकला, ताप, येऊन अनेकांना अंथरुण धरावे लागते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे स्किन इन्फेक्शन होणे, अ‍ॅलर्जी अशाही समस्या उद्भवतात. इतर ऋतूप्रमाणे पावसाळ््यातही स्वच्छ पाणीपुरवठा होत असला तरी पाणी भरताना, साठवताना आणि पितांना या तीनपैकी कोणत्यातही एका बाबतीत निष्काळजीपणा झाल्याने पाणी दूषित होते. यासाठी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.डासांपासून सावध रहा पावसाळ््यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. अशा पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची अधिक पैदास होते.त्यामुळे या काळात मलेरिया,डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येते.याशिवाय स्किन इन्फेक्शनच्या समस्यासुद्धा अधिक प्रमाणात वाढतात. दूषित पाण्यामुळे जुलाब, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपिटायटीस असे आजार उद्भवतात. गर्भवती स्त्रियांमध्ये हेपिटायटीस ई होण्याची शक्यता अधिक असते. सर्दी आणि खोकला हे आजार बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.महत्त्वाच्या टिप्सज्या भांड्यात आधी पाणी भरले, तेच भांडे न धुऊन घेता पुन्हा त्यात पाणी भरणे किंवा वॉश बेसिन तसेच टॉयलेटजवळ पाणी साठवून ठेवणे, यामुळे पाण्यातून इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते़ म्हणून आधीच पाणी भरलेल्या भांड्यात पुन्हा पाणी भरु नका़पिण्याचे पाणी माठातून किंवा टाकीतून घेताना थेट ग्लास त्यात बुडवू नका़ खाता-पिताना हात स्वच्छ धुतलेले असतील, याची काळजी घ्या़ बाहेरुन स्वच्छ पाणी आले, तरी सोसायटीच्या टाक्यांमध्ये आजूबाजूला साचलेले पावसाचे खराब पाणी मिक्स होण्याचीही शक्यता असते म्हणूनच सोसायटीच्या टाकीत असे पाणी जाणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते़आजार आणि लक्षणेटायफाईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे, डोकेदुखी़हेपिटायटीस ए आणि ई -डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, उलटी झाल्यासारखे वाटणे, बारीक ताप येणे़गॅस्ट्रो, डायरिया : उलटी होणे, जुलाब होणे. अशी घ्या काळजी...बाहेरचे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये जेवताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत़पाणी गाळून आणि उकळून प्यावे, फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावेत.भाज्या नीट धुऊन, उकळून घ्या़बाथरुममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्या.