शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

300 वर्षांच्या परंपरेला बसली खीळ

By admin | Updated: August 24, 2014 23:53 IST

दगडू सोमाणी, गंगाखेड येथील वैष्णव घाटाला गटाराच्या दलदलीने घेरल्याने शेकडो वर्षांपासूनच्या चालत आलेल्या परंपरेला खीळ बसत आहे़

दगडू सोमाणी, गंगाखेडशहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीतील दशक्रिया व अन्य विधी करण्यासाठी येथील वैष्णव घाटाला पौराणिक व धार्मिक महत्त्व आहे़ मात्र या घाटाला गटाराच्या दलदलीने घेरल्याने शेकडो वर्षांपासूनच्या चालत आलेल्या परंपरेला खीळ बसत आहे़ महाराष्ट्रात नाशिकनंतर गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या वैष्णव घाटावर दशक्रिया, नारायण नागबळी, पितृदोष व कालसर्प शांती आदी विधी उरकण्यासाठी महत्त्व आहे़ गंगाखेड येथील गोदावरी नदी नभी स्थान असल्यामुळे हे सर्व विधी या ठिकाणी पार पडतात़ चालू पावसाळी हंगामात पाऊस न झाल्याने गोदावरी पात्रात पाणी आले नाही़ त्यामुळे दशक्रिया विधी उरकरण्यासाठी पुरोहित व बाहेरगावाहून येणाऱ्या कुटूंबांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो़ ३०० वर्षांपूर्वी येथील गोदावरी पात्रात दशक्रियेसह अन्य विधी उरकता यावेत, म्हणून अहिल्याबाई होळकरांनी वैष्णव घाटाची निर्मिती केली़ तर संस्थानिक राजे रघुत्तम राजे यांनी विधी उरकण्यासाठी ओवऱ्याची निर्मिती केली़ मागील ३५० वर्षांपासून गोदावरी नदीच्या वैष्णव घाटावर दशक्रिया विधीसह अन्य विधी उरकण्यासाठी बीदर, गुलबर्गा, हैदराबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड व परभणी जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी येतात़ दररोज या घाटावर ५० ते १०० व्यक्तींचे कुटुंब दशक्रिया विधी करण्यासाठी या ठिकाणी येतात़ हा विधी पार पाडण्यासाठी गोदावरी नदीचे स्रान करावे लागते़ त्यानंतर ओल्या कपड्याने तीन-चार तासांत हा विधी पूर्ण केला जातो़ शहरातील येणारे गटाराचे पाणी आज या घाटावर थांबत आहे़ यामुळे घाण पाण्याचा विधीसाठी येणारे नागरिक नाईलाजाने स्रानासाठी वापर करतात़ मागील वर्षी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन या घाटाची सफाई मोहीम राबविली़ त्यामुळे घाट स्वच्छ झाला़ मात्र स्वच्छ घाटात घाण व दूषित पाण्याने बस्तान मांडले आहे़ वास्तविक पाहता गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात हा विधी उरकावा असे धर्मशास्त्राप्रमाणे म्हटले जाते़ गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या घाटाला धार्मिक व पौराणिक महत्त्व असताना केवळ दूषित पाण्याअभावी या विधी कार्याचे महत्त्व कमी होत आहे़ नदीत शहरातील येणारे सांडपाणी इतरत्र वळवावे व शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या विधी, परंपरा या घाटावर चालू रहाव्यात, अशी मागणी होत आहे़ प्रयागतीर्थ झऱ्याने तारलेगोदावरी पात्रात मागील तीन- वर्षांत वाहते पाणी बंद झाले व वैष्णव घाटावर घाण पाणी असताना या ठिकाणी साचलेल्या प्रयाग तीर्थ पाण्याच्या झऱ्यामुळे दशक्रियेसह अन्य विधी उरकण्यासाठी मोठी मदत झाली़ आज केवळ या झऱ्यामुळे या ठिकाणचे विधी पार पडतात व विधी कार्यक्रम पुढे चालू आहेत़ केवळ एक प्रयागतीर्थ झरा दररोज शेकडो कुटुंबियास विधी पार पाडण्यासाठी मदत करतो़ कपडे व जनावरे धुतातगोदावरी पात्रात शहरातील सांडपाण्यामुळे येथील पाणी दूषित झाले असून, याच घाटावर शहरातील नागरिक कपडे धुतात़ तर काही व्यक्ती जनावरे देखील याच ठिकाणी पाण्यात धुतली जातात़ या दूषित पाण्यामुळे रोगराई होण्याची शक्यता असतानाही महिला मंडळींना या घाटावर कपडे धुण्याचा मोह आवरत नाही़ दूषित पाण्यामुळे पित्रपुरोहितांच्या व्यवसायावर पाणीगोदावरीच्या वैष्णव घाटावर दशक्रिया विधी उरकण्यासाठी दररोज या ठिकाणी ५० पित्रपुरोहित (वैदिक ब्राह्मण) उपस्थित असतात़ या विधीमुळे जवळपास १०० ते १५० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो़ वर्षातील काही महिने व वर्ष ही कुटुंब आपसात वाटून घेतात़ दशक्रिया विधीतून पित्रपुरोहित कुटुंबाची रोटीरोजी निर्माण होते़ मात्र घाटावर वाहते पाणी रहात नसल्यामुळे गंगाखेड घाटावरील विधीचे महत्त्व कमी होत असून, बाहेरगावाहून येणाऱ्या कुटुंबांची संख्या रोडावत आहे. परिणामी पित्रपुरोहितांच्या व्यवसायावर पाणी फिरत असल्याची प्रतिक्रिया तीर्थक्षेत्र पुरोहित बंडूदेव जोशी यांनी दिली़ विधीसाठी याठिकाणी स्रानाची, राहण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने तसेच दूषित पाण्यामुळे गंगाखेडच्या गोदावरी नदीवर येण्यापेक्षा नाशिककडे जाण्याचा कल वाढला आहे़ ४गंगाखेडपासून ३ किमी अंतरावर गोदावरी पात्रात मुळी येथे बंधारा उभारण्यात आला़ त्यामुळे वाहते पाणी चार वर्षांपासून बंद आहे़ यानंतर गंगाखेडपासून ३० किमी अंतरावर डिग्रस बंधारा झाला़ बंधारा उभारल्यानंतर गंगाखेडच्या गोदावरी नदी पात्रात ५ ते ६ फुट पाणी राहणार असे केंद्रीय जल आयोगाने जाहीर केले होते़ मात्र तेही पाणी गोदावरीच्या वैष्णव घाटाजवळ आले नाही़