शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

अंबाजोगाई तालुक्यात जलस्त्रोतांनी गाठला तळ

By admin | Updated: July 7, 2014 00:08 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तालुक्यात जून महिना लोटला तरी पाऊस न झाल्याने पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईतालुक्यात जून महिना लोटला तरी पाऊस न झाल्याने पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट तालुक्याला भेडसावत असून ठिकठिकाणच्या जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. तालुक्यात ७२ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुक्याचे खरीप हंगामाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ७४ हजार ८५३ हेक्टर आहे. यापैकी घाटनांदूर परिसरात १९३३ हेक्टर, बर्दापूर २६.६ हेक्टर, लोखंडी २५ हेक्टर, अंबाजोगाई १५ हेक्टर तर पाटोदा परिसरात कुठेही पेरणी झाली नाही. तालुक्यात केवळ १९९९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर तालुक्यातील उर्वरित ७२ हजार ८५४ हेक्टर क्षेत्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात एवढया मोठ्या प्रमाणात पेरण्या रखडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाई व परिसरात होणाऱ्या अत्यल्प पावसामुळे अगोदरच या तालुक्याची स्थिती दुष्काळसदृश्य होती. त्यातच पुन्हा यावर्षीही पावसाने दडी मारल्याने शेत्तकरी हवालदिल झाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग व तीळ ही पिके आता उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी न झाल्यास हे पीकही पुन्हा संकटात सापडणार असल्याने शेतीचे काय? हा प्रश्न तीव्रतेने भेडसावू लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यात अत्यल्प पावसामुळे गेल्या तीन वर्षात अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाने तळ गाठल्याने अंबाजोगाईकरांना महिन्यातून केवळ दोन वेळाच पाणीपुरवठा होतो. तर ग्रामीण भागातही जलस्त्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागातील ५२ गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. ४२ गावांमध्ये ५३ विंधन विहिरी व विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र अधिगृहण केलेल्या या विहिरींनी तळ गाठल्याने पाणी प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. तालुक्यात ८३ हातपंप, १० विद्युत पंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. ज्याठिकाणी पाण्याची उपलब्धता असली तरीही भारनियमनामुळे आहे हे पाणी मिळणेही ग्रामस्थांसाठी दुरापास्त झाले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जून, जुलै महिना मे पेक्षाही कडक उन्हाचा ठरू लागला आहे. येत्या आठवडाभरात पाऊस न झाला तर शेतकऱ्यांना दुष्काळ स्थितीचा मोठा सामना करावा लागणार आहे. याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण तालुक्यालाच मोठ्या तीव्रतेने भेडसावणार आहे.