शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

बरसो रे मेघा़़़ बरसो रे़़़

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़

लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़ परंतु, आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार पाऊस जिल्ह्यतील इतर तालुक्यात झालेला नाही़ दिवसा ढगाळ वातावरण व रात्री पाऊस होण्याऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमनाकडे लागल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी, निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टर वर पेरणी झाली परंतु पुरेशा आद्रार नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार मोठा पाऊस जिल्ह्यातील इतर तालुक्यात झालेला नाही़दिवसा ढगाळा वातावरण व रात्री पाऊसा ऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमणाकडे लागल्या आहेत लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग ,उडीद, तूर, मका, साळ, भुईमूग, सूर्यफूल इ. पिकांचा समावेश आहे़ जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९५ हजार हेक्टर कार्यक्षेत्र आहे़ जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे केली़ तसेच खता बियाणाचेही नियोजन केले मृग नक्षत्रात २० जुन रोजी लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकूर आदी तालुक्यात रिमझीम पाऊस झाला तर निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने झालेल्या पावसावर बळीराजांने काळ्या आईची ओटी भरली परंतू आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याने व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा नजरा आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ कृषी तज्ज्ञांच्या सल्यानुसार जूनअखेरपर्यत पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचा पेरण्या वेळेवर होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही त्यांनी सांगितले़ मृग नक्षत्राच्या सुरूवातील १०:२६:२६़, डी़एपी, १८:१८:१०, १४:३५:१४, १२:३२:१६ यासह इतर खताचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली परंतू नंतरच्या कालावधीत वरूनराजाच्या लांबण्यामळे खतविक्रीची ७० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़ तर बियाणाच्या ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़परिणामी खते, बियाणेधारक व्यापाऱ्यासह बळीराजा चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे़१०० हेक्टरवर पेरणी़़़जिल्हाभरात ५ लाख ९५ हेक्टर टक्के खरिपाचे क्षेत्र असतांनाही अल्पशा पावसामुळे निलंगा, शिरूर अनंतपाळ,देवणी या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली परंतु उर्वरित रेणापूर, लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकुर या तालुक्यात मोठा पाऊस न पडल्यामुळे अध्यापही ५ लाख हेक्टर क्षेत्र अध्यापही उजाड असलेले दिसून येत आहे़ त्यामुळे पावसाच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत़ खत व बियाणे विक्रीवर परिणाम़़़शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीनुसार पाऊस न पडल्यामुळे पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा आहे़तर पाऊस न पडल्यामुळे खते बियाणाच्या दुकानावर गर्दी नसल्यामुळे खताची ९० टक्के उलाढाल ठप्प आहे तर बियाणाची ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़मृग नक्षत्र संपला आद्रा सुरू झाले तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़उशीरा होणाऱ्या पावसामुळे सुयफुल, मका,तुर आदी पिकावर परिणाम होणार नाही पंरतू खरिपाच्या इतर पिकावर मात्र या पावसाचा परिणाम असून उशीरा पेरणी झालेल्या पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले