शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
4
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
5
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
6
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
7
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
8
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
9
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
10
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
11
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
12
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
13
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
14
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
15
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
16
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
17
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
18
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
19
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
20
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

बाप्पाच्या निरोपाची तयारी

By admin | Updated: September 6, 2014 23:34 IST

शहरात पोलीस अधिकारी आणि कर्मचा:यांनी मिरवणूक मार्ग तसेच इतर महत्त्वाच्या रस्त्यावरून पथसंचलन करून सुरक्षाव्यवस्था सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.

गेवराई : शेतकऱ्यांवर कशा न कशाचे तरी संकट येत राहते. कधी पाऊस नसतो तर कधी पाणी नसते. कधी गारपीट होते तर कधी अनुदान मिळत नाही. अशा समस्यातून तग धरून पेरणी झाली. पिके वाढीला लागली असतानाच हरिणांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. सात जुलै रोजी जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. काही भागात पाऊस तर काही भागात नाही अशी परिस्थिती त्यावेळी होती. या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकल्या होत्या. आॅगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला. लावलेल्या बियाणांचे रोपटे झाले असताना शेतकऱ्यांनी बैलगाडीमधून टाकीने पाणी आणून रोपट्यांना पाणी घातले होते. पेरलेले पीक वाया गेले तर पुन्हा आर्थिक संकट ओढावेल या भितीने नियमितपणे या रोपट्यांना शेतकऱ्यांनी पाणी घातले होते. गणपतीच्या आगमनानंतर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली.गेवराई परिसरात धुंवॉधार पाऊस झाल्यामुळे जागोजागचा शेत परिसर पाण्याने भरून गेला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता जवळपास पाऊस ओसरला आहे. पिके गुडग्या ऐवढी वाढली आहेत. अशी सुखकारक स्थिती असताना परिसरातील हरणे शेतामध्ये येऊन धुमाकूळ घालत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.हरिणांवर हल्ला केला किंवा त्यांना मारले तर त्यांचा जीव जाऊ शकतो. परिणामी वन्य प्राण्यांना मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. या भितीने शेतकरी त्यांना मारायच्या भानगडीत पडत नाहीत. कोणत्याही वेळी हरणे कळपाने येऊन पळत जातात. त्यांच्या पायदळी पिके तुडविली जात असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. गेवराई तालुक्यातील उमापूर, धोंडराई, चकलांबा, मालेगाव , गुळज, राक्षसभुवन कुरण पिंप्री, पाचेगाव, पाडळसिंगी यासह अनेक गावातील पिके हरिणांद्वारे नासधूस केली जात आहेत. तालुका परिसरात जवळपास दहा ते पंधरा हरिणांचे कळप आहेत. काही हरिणे पिके फस्त करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव त्रस्त झाला आहे. पिकांची लागवड झाली. पिके वाढीला लागली आता पुन्हा शेतकऱ्यांना या नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)