शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:44 IST

हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला. तो भव्यदिव्य ठरला, लक्ष वेधून घेणारा ठरला. या मोर्चाने बंजारा समाजाची जणू ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विधानपरिषदेचे सदस्यद्वय प्रा.जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड हे मोर्चात पायी चालले. सीमा राठोडचे आई- वडीलही या मोर्चात सहभागी झाले होते. पण कृती समितीच्या निर्णयानुसार तीन मुलींव्यतिरिक्त मोर्चाच्या समारोपस्थळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या सभेत अन्य कुणीही बोलले नाही. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन या मुलींनीच दिले.सकाळपासून औरंगाबादचा क्रांतीचौक बंजारा स्त्री- पुरुषांनी फुलत होता. तांड्यातांड्यातून बंजारा बंधू-भगिनी येतच राहिल्या. सकाळी ११ वाजता निघणारा हा मोर्चा दुपारी १ च्या सुमारास क्रांतीचौकातून मार्गक्रमण करू लागला. दोन दोनच्या रांगेत शिस्तीत हा मोर्चा सुरू झाला. मोर्चाच्या अग्रभागी भलेमोठे बॅनर धरून पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिला चालत होत्या. त्यापाठोपाठ बंजारा तरुणी चालत होत्या. नंतर मोठ्या संख्येने सहभागी झालेला बंजारा तरुण वर्ग होता. जवळपास प्रत्येकाच्याच हातात ‘ जय सेवालाल’चे झेंडे होते आणि बहुतेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. अनेक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि त्यावर ‘सीमा राठोडच्या मारेकºयांना फाशी द्या’ असे लिहिलेले होते.यापुढे सीमा राठोड घडणार नाहीमूक मोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रविना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला. रविना राठोड म्हणाली, सीमा राठोडसारखी वेळ कुणावरही येऊ नये.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते, असे सांगितले जाते, पण स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा तरी अधिकार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. दररोज स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतच आहेत. पण यापुढे तरी सीमा राठोड घडणार नाही, याची काळजी आता सर्वांनी घेतली पाहिजे.न्यायालयीन चौकशी करा -कवाडेसभास्थळीच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विधानपरिषदेत मी आणि हरिभाऊ राठोड यांनी सीमा राठोड हत्या प्रकरण उचलले होते. कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अद्याप साधे चार्जशीटसुद्धा दाखल झालेले नाही. या अन्याय- अत्याचार सहज घेतले जातात, असा आरोपही प्रा. कवाडे यांनी यावेळी केला. गरिबांच्या लेकीबाळी म्हणजे भाजीपाला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.या मोर्चात ध्वनिक्षेपकावरून राजपालसिंग राठोड हे बंजारा भाषेतच सूचना देत होते. मागणीपत्रावर डॉ. कृष्णा राठोड, राजेंद्र प्रल्हाद राठोड, अनिल चव्हाण, गोरखनाथ राठोड, रमेश पवार, पी. एम. पवार, नीलेश चव्हाण, सुनील चव्हाण, शरयू राठोड, कलाबाई राठोड, (पान ५ वर)