शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:44 IST

हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला. तो भव्यदिव्य ठरला, लक्ष वेधून घेणारा ठरला. या मोर्चाने बंजारा समाजाची जणू ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विधानपरिषदेचे सदस्यद्वय प्रा.जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड हे मोर्चात पायी चालले. सीमा राठोडचे आई- वडीलही या मोर्चात सहभागी झाले होते. पण कृती समितीच्या निर्णयानुसार तीन मुलींव्यतिरिक्त मोर्चाच्या समारोपस्थळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या सभेत अन्य कुणीही बोलले नाही. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन या मुलींनीच दिले.सकाळपासून औरंगाबादचा क्रांतीचौक बंजारा स्त्री- पुरुषांनी फुलत होता. तांड्यातांड्यातून बंजारा बंधू-भगिनी येतच राहिल्या. सकाळी ११ वाजता निघणारा हा मोर्चा दुपारी १ च्या सुमारास क्रांतीचौकातून मार्गक्रमण करू लागला. दोन दोनच्या रांगेत शिस्तीत हा मोर्चा सुरू झाला. मोर्चाच्या अग्रभागी भलेमोठे बॅनर धरून पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिला चालत होत्या. त्यापाठोपाठ बंजारा तरुणी चालत होत्या. नंतर मोठ्या संख्येने सहभागी झालेला बंजारा तरुण वर्ग होता. जवळपास प्रत्येकाच्याच हातात ‘ जय सेवालाल’चे झेंडे होते आणि बहुतेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. अनेक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि त्यावर ‘सीमा राठोडच्या मारेकºयांना फाशी द्या’ असे लिहिलेले होते.यापुढे सीमा राठोड घडणार नाहीमूक मोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रविना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला. रविना राठोड म्हणाली, सीमा राठोडसारखी वेळ कुणावरही येऊ नये.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते, असे सांगितले जाते, पण स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा तरी अधिकार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. दररोज स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतच आहेत. पण यापुढे तरी सीमा राठोड घडणार नाही, याची काळजी आता सर्वांनी घेतली पाहिजे.न्यायालयीन चौकशी करा -कवाडेसभास्थळीच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विधानपरिषदेत मी आणि हरिभाऊ राठोड यांनी सीमा राठोड हत्या प्रकरण उचलले होते. कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अद्याप साधे चार्जशीटसुद्धा दाखल झालेले नाही. या अन्याय- अत्याचार सहज घेतले जातात, असा आरोपही प्रा. कवाडे यांनी यावेळी केला. गरिबांच्या लेकीबाळी म्हणजे भाजीपाला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.या मोर्चात ध्वनिक्षेपकावरून राजपालसिंग राठोड हे बंजारा भाषेतच सूचना देत होते. मागणीपत्रावर डॉ. कृष्णा राठोड, राजेंद्र प्रल्हाद राठोड, अनिल चव्हाण, गोरखनाथ राठोड, रमेश पवार, पी. एम. पवार, नीलेश चव्हाण, सुनील चव्हाण, शरयू राठोड, कलाबाई राठोड, (पान ५ वर)