शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागद परिसरातील केळी गेली सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST

रवींद्र अमृतकर नागद : दिल्ली, मुंबईसह राज्यातील इतर भागात पोहोचलेली नागद भागातील केळीची गोडी आता सातासमुद्रापारही चाखली जाणार आहे. ...

रवींद्र अमृतकर

नागद : दिल्ली, मुंबईसह राज्यातील इतर भागात पोहोचलेली नागद भागातील केळीची गोडी आता सातासमुद्रापारही चाखली जाणार आहे. परिसरातील पंधरा ते सोळा शेतकऱ्यांची केळी आता इराण व अरब राष्ट्रांतील दुबईला पाठविली जात आहेत. यामुळे इतर शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या असून चांगल्या दर्जाची केळी उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. केळीच्या निर्यातीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगला नफा मिळून आर्थिक उन्नती साधली जाणार आहे.

नागद परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. येथील केळीचा दर्जा चांगला असल्याने ती राज्यभरासह देशातील मोठमोठ्या शहरात विक्रीसाठी व्यापारी खरेदी करून नेत असतात. मात्र, येथील केळीचा दर्जा पाहून नाशिक येथील निर्यातदार कंपनीने शेतकऱ्यांना त्यांचा माल विदेशात पाठविण्यासाठी पाठबळ दिले. यानंतर त्यांनी या भागात पाहणी केल्यानंतर पंधरा ते सोळा शेतकऱ्यांच्या बागांची निवड केली आहे. यानंतर त्यांनी दर्जाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्या नागद येथील प्रगतशील शेतकरी रणजित राजेंद्र राजपूत व पांगरा येथील चत्तरसिंह राजपूत या शेतकऱ्यांची केळी आखाती देशात पाठविण्यात आली आहेत. स्थानिक बाजारापेक्षा शेतकऱ्यांना क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपये जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत पंधरा ते सोळा शेतकऱ्यांचा मालही इराण, दुबईला निर्यात केला जाणार आहे. यामुळे या भागातील इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दर्जेदार केळी उत्पादन करण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. यावर्षी कमी शेतकऱ्यांची केळी विदेशात जातील, तर पुढीलवर्षी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे शेतकरी नीलेश राजपूत यांनी सांगितले..

चौकट....

स्पेशल पॅकिंगसाठी आणले बंगालमधील मजूर

केळी इराण व दुबईला निर्यात करण्यासाठी ४० ते ४५ दिवस लागतात. त्यामुळे निर्यात करण्यासाठी विशेष पॅकिंग करावे लागते. सदर पॅकिंगबाबत स्थानिक मजुरांना माहिती नसल्याने केळी उत्पादक कंपनीच्या सहकार्यातून पश्चिम बंगालमधून मजूर आणण्यात आले आहेत. एकावेळी एक गाडी लोड करण्यासाठी १५-१६ जण काम करतात.

कोट

नागदची केळी जशी देशात प्रसिद्ध आहेत, तशी ती आता विदेशात पण प्रसिद्ध होतील. केळीला आम्ही रासायनिक खते फार कमी प्रमाणात देत असून जिवामृत व गांडूळ खताचा वापर केला जात आहे. सदरील केळींची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी कृषी विभागासह केळी निर्यात करणाऱ्या कंपनीचे सहकार्य लाभत आहे.

- रणजित राजपूत, केळी उत्पादक शेतकरी.

फोटो :

150621\img_20210611_131501_1.jpg

नागद परिसरातील केळी.