शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य!

By admin | Updated: April 20, 2016 23:24 IST

जालना : गटा तटात विखुरलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे नेत्यांची जबाबदारी आहे, त्याच प्रमाणे समाजबाधवांवरही एक जबाबदारी आहे.

जालना : गटा तटात विखुरलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे नेत्यांची जबाबदारी आहे, त्याच प्रमाणे समाजबाधवांवरही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करण्यास तयार असल्याची घोषणा रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी बुधवारी केली.भारत भीम यात्रेनिमित्त जालन्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, एन. डी. गायकवाड, दिंगबर गायकवाड, संगीता अंभोरे, सतिश वाहुळे आदींची उपस्थिती होती.यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता निर्माण करण्याचे, सर्वांना रोजी, रोटी आणि कपडा देण्याचे घटनात्मक अधिकारांच्या माध्यमातून न्याय देण्याचे, जाती व्यवस्था नष्ट करण्याचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रिपाइंच्यावतीने २६ जानेवारी रोजी कन्याकुमारीपासून जाती- तोडो, समाज जोडोचा संकल्प हाती घेवून भारत भीम यात्रा सुरू करण्यात आली आहे.जातीमुळे तुटत चाललेला समाज एकत्र आणण्याचा तो एक प्रयत्न आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज रिपाइंचे अनेक गट असले तरी एकच रिपाइं देशभर लोकांसमोर आहे. विखुरेलेले हे गट एकत्र यावेत ही सर्वांची इच्छा आहे. या ऐक्यासाठी आपण चार पावले मागे घेण्यास तयार ुआहोत. ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आपल्याला मान्य आहे.हे ऐक्य टिकविण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ही समाजबांधवाची राहणार आहे. ऐक्यातील एखादा नेता फुटून जर बाहेर पडला तर त्याचे मागे न जाता. त्यालाच आपल्या गावात, जिल्ह्यात बंदी घालून फिरू देवू नये. तसेच इतर जातीचे मत कसे मिळेल यासाठीचा प्रयत्नही करावे लागेल. हेच एक हे मोठे आव्हान राहणार असल्याचे ते म्हणाले. भारत भीम यात्रेचा समारोप १ मे रोजी महू येथे होणार असून, यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानात बदल करू पाहत आहेत. असा कॉग्रेसचा मोदी विरोधात खोटा प्रचार सुरू असल्याचे खा. आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, संविधान कुणालाही बदलता येत नाही. त्यातील काही कायद्यांच्या तरतुदीत असलेली कलमे बदलून नव्यान कायदा करता येऊ शकतो. मात्र संविधानात बदल करता येत नाही. ज्या दिवशी संविधान बदलासाठी त्याला हात लावला जाईल, तो दिवस सरकारचा शेवटचा दिवस असेल. कोणालाही संविधान बदलू देणार नाही. ४काँग्रेसकडून मोदी संविधानात बदल करत असल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. काँग्रसेला अद्याप विरोधीपक्षाची भूमिकाच निभावता आलेली नाही. भाजपा आघाडीचे सरकार हे सक्षम असून, ते ५ वर्ष टिकेल. तेव्हा काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी आपली विरोधकांची नैतिक जबाबदारी स्विकारली पाहिजे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. मात्र स्वतंत्र मराठवाडा नको. डॉ. आंबेडकरांनी नदीजोडप्रकल्पाची संकल्पना त्याकाळी मांडली होती. मात्र, अद्याप त्यावर अंमल झालेला नाही. भाजपा सरकार हा प्रकल्प राबवेल अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली.भारत भीम यात्रेतून जाती तोडा समाज जोडाचा संदेश दिला जात आहे. यासाठी सरकारने अंतरजातीय विवाहाला प्रात्साहन दिले पाहिजे. अंतरजातीय विवाह करणाऱ्यापैकी एकाला सरकारी नोकरी आणि ५ लाखांची आर्थिक मदत द्यावी. मध्यप्रदेशातील महू या डॉ. बाबासाहेबांच्या जन्म गावी स्मारकाची व्याप्ती वाढविण्यासाठी जागा द्यावी, कन्याकुमारी येथील समुद्राच्या त्रिवेणी संगमात स्वामी विवेकानंदांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा या मागण्या भारत भिम यात्रेतून करण्यात येत असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले.