शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
2
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
3
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
4
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
5
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
6
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
7
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
8
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
9
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
10
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
11
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
12
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
13
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
14
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
15
परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद! ७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार?
16
बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल
17
भीषण अपघात, भरधाव कार रस्त्यावरून घसरून झाडावर धडकली, तीन मित्रांचा जागीच मृत्यू 
18
Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी
19
आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
20
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य!

By admin | Updated: April 20, 2016 23:24 IST

जालना : गटा तटात विखुरलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे नेत्यांची जबाबदारी आहे, त्याच प्रमाणे समाजबाधवांवरही एक जबाबदारी आहे.

जालना : गटा तटात विखुरलेल्या रिपब्लिकन जनतेला एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे नेत्यांची जबाबदारी आहे, त्याच प्रमाणे समाजबाधवांवरही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करण्यास तयार असल्याची घोषणा रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी बुधवारी केली.भारत भीम यात्रेनिमित्त जालन्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, एन. डी. गायकवाड, दिंगबर गायकवाड, संगीता अंभोरे, सतिश वाहुळे आदींची उपस्थिती होती.यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता निर्माण करण्याचे, सर्वांना रोजी, रोटी आणि कपडा देण्याचे घटनात्मक अधिकारांच्या माध्यमातून न्याय देण्याचे, जाती व्यवस्था नष्ट करण्याचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रिपाइंच्यावतीने २६ जानेवारी रोजी कन्याकुमारीपासून जाती- तोडो, समाज जोडोचा संकल्प हाती घेवून भारत भीम यात्रा सुरू करण्यात आली आहे.जातीमुळे तुटत चाललेला समाज एकत्र आणण्याचा तो एक प्रयत्न आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज रिपाइंचे अनेक गट असले तरी एकच रिपाइं देशभर लोकांसमोर आहे. विखुरेलेले हे गट एकत्र यावेत ही सर्वांची इच्छा आहे. या ऐक्यासाठी आपण चार पावले मागे घेण्यास तयार ुआहोत. ऐक्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व आपल्याला मान्य आहे.हे ऐक्य टिकविण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ही समाजबांधवाची राहणार आहे. ऐक्यातील एखादा नेता फुटून जर बाहेर पडला तर त्याचे मागे न जाता. त्यालाच आपल्या गावात, जिल्ह्यात बंदी घालून फिरू देवू नये. तसेच इतर जातीचे मत कसे मिळेल यासाठीचा प्रयत्नही करावे लागेल. हेच एक हे मोठे आव्हान राहणार असल्याचे ते म्हणाले. भारत भीम यात्रेचा समारोप १ मे रोजी महू येथे होणार असून, यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानात बदल करू पाहत आहेत. असा कॉग्रेसचा मोदी विरोधात खोटा प्रचार सुरू असल्याचे खा. आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, संविधान कुणालाही बदलता येत नाही. त्यातील काही कायद्यांच्या तरतुदीत असलेली कलमे बदलून नव्यान कायदा करता येऊ शकतो. मात्र संविधानात बदल करता येत नाही. ज्या दिवशी संविधान बदलासाठी त्याला हात लावला जाईल, तो दिवस सरकारचा शेवटचा दिवस असेल. कोणालाही संविधान बदलू देणार नाही. ४काँग्रेसकडून मोदी संविधानात बदल करत असल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. काँग्रसेला अद्याप विरोधीपक्षाची भूमिकाच निभावता आलेली नाही. भाजपा आघाडीचे सरकार हे सक्षम असून, ते ५ वर्ष टिकेल. तेव्हा काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी आपली विरोधकांची नैतिक जबाबदारी स्विकारली पाहिजे. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. मात्र स्वतंत्र मराठवाडा नको. डॉ. आंबेडकरांनी नदीजोडप्रकल्पाची संकल्पना त्याकाळी मांडली होती. मात्र, अद्याप त्यावर अंमल झालेला नाही. भाजपा सरकार हा प्रकल्प राबवेल अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली.भारत भीम यात्रेतून जाती तोडा समाज जोडाचा संदेश दिला जात आहे. यासाठी सरकारने अंतरजातीय विवाहाला प्रात्साहन दिले पाहिजे. अंतरजातीय विवाह करणाऱ्यापैकी एकाला सरकारी नोकरी आणि ५ लाखांची आर्थिक मदत द्यावी. मध्यप्रदेशातील महू या डॉ. बाबासाहेबांच्या जन्म गावी स्मारकाची व्याप्ती वाढविण्यासाठी जागा द्यावी, कन्याकुमारी येथील समुद्राच्या त्रिवेणी संगमात स्वामी विवेकानंदांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा या मागण्या भारत भिम यात्रेतून करण्यात येत असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले.