यावेळी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.
नागरिकांनी रात्री-अपरात्री बाहेर पडू नये, पडल्यास सोबत बॅटरी ठेवावी, मोबाइलवर गाण्यांचा आवाज मोठा ठेवावा, सोबत काठी बाळगावी, एकट्याने शेतात जाणे टाळावे आदी सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी कैलास जाधव, वनरक्षक एकनाथ सिरसाट, छाया खरात, शेख रशीद शेख, सोमीनाथ बरडे, माजी सरपंच शिवाजीराव कर्डिले, भारत जैस्वाल, सचिन भोजने, राम भागवत, रवी बोडखे, बापू बोडखे, अनिल लेकुरवाळे, सतीश भागवत, संतोष हारदेंसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो : गल्ले बोरगावात शेतकऱ्यांना बिबट्याविषयी मार्गदर्शन करताना वनविभागाचे अधिकारी.