शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

विहिरीची बिले देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 13, 2014 01:15 IST

धारुर: तालुक्यातील पिंपरवडा येथे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसिंचन विहिरीचे काम पृूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे.

धारुर: तालुक्यातील पिंपरवडा येथे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसिंचन विहिरीचे काम पृूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. एवढा कालावधी उलटूनही पंचायत समितीतील संबंधित विभागातील कर्मचारी बिले काढत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरीची प्रलंबित बिले देण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. धारुर तालुक्यातील पिंपरवडा येथे २००८ ते ०९ या कालावधीमध्ये महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलसिंचन विहिरी खोदण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. याच कालावधीमध्ये ग्रामसेवक संघटनेचा या योजनेच्या कामावर बहिष्कार होता. बहिष्कार मागे घेतल्यानंतर दीर्घ काळाच्या विलंबाने कामे सुरू करण्यात आली. कामे सुरू असताना पंचायत समितीमध्ये मजुराचे हजेरीपट उपलब्ध नव्हते. कामे पूर्ण करुनही मजुराचे मानधन देण्यास दीर्घ काळ उशीर झाला. या परिस्थितीतही विहिरीचे काम पूर्ण करण्यात आली आहेत. कामे पूर्ण करुनही पंचायत समितीतील संबंधित विभागातील शाखा अभियंता, सहायक, ग्रामसेवक यांनी कामे पूर्ण करुनही उर्वरित बिले देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जलसिंचन विहिरीची प्रलंबित बिले देण्यास टाळाटाळ व आर्थिक पिळवणूक करुन कर्तव्यात कसूर करणार्‍या संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या गलथान कारभाराची चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे. या भ्रष्ट व कामचुकार अधिकार्‍यांची चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हनुमंत तिडके, श्रीमंत तिडके, दत्तू तिडके, संजय तिडके आदी शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांमधून संताप शेतकर्‍यांना पंचायत समितीतील संबंधित विभागातील कर्मचार्‍यांकडून वेळेवर बिले न मिळाल्याने त्यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या शेतकर्‍यांनी वेळेवर बिले न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणीही या शेतकर्‍यांनी केली आहे. शेतकर्‍यांनी उग्ररुप धारण केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. बिले देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी दीड वर्षाचा कालावधी उलटूनही पंचायत समितीतील कर्मचारी बिले काढत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात. प्रलंबित बिले देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. पिंपरवडा येथे २००८ ते ०९ या कालावधीमध्ये महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलसिंचन विहिरी खोदण्यासाठी देण्यात आली आली होती प्रशासकीय मंजुरी.