शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

नव्या रेल्वेसाठी टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:47 IST

मुंबईला जाण्यासाठी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘दमरे’च्या नांदेड विभागाने प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली; परंतु कधी रेल्वे बोर्डाकडे, तर कधी मध्य रेल्वेक डे बोट दाखविले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबईला जाण्यासाठी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘दमरे’च्या नांदेड विभागाने प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली; परंतु कधी रेल्वे बोर्डाकडे, तर कधी मध्य रेल्वेक डे बोट दाखविले जात आहे. या टोलवाटोलवीमुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय पाहता नांदेड ते मुंबई नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर जूनमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौ-यानंतर नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली.राज्यराणी एक्स्प्रेसला आठ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला; परंतु मागील सात महिन्यांपासून यावर निर्णय झालेला नाही. मुंबईत रेल्वेच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नव्या रेल्वेला मंजुरी मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते, तर कधी प्रस्ताव बोर्डाकडे असल्याचे सांगितले जाते. याविषयी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले की, सध्या प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आहे. या रेल्वेसाठी प्रयत्न सुरू आहेत.मुंबईसाठी नव्या रेल्वेची टिष्ट्वटरद्वारेही मागणी केली जाते; परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. प्रस्ताव पाठविला की नाही, यावरच शंका उपस्थित होते. प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे लवकर सुरू झाली पाहिजे, असे नमो हायवे अ‍ॅण्ड रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नहाटा म्हणाले.