शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांना मुबलक पाणी मिळण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST

आता पाणी मिळण्याची शक्यता समांतर जलवाहिनी हा प्रकल्प चांगला होता. महापालिकेला आणि संबंधित कंपनीला प्रकल्प राबविता आला नाही. आता ...

आता पाणी मिळण्याची शक्यता

समांतर जलवाहिनी हा प्रकल्प चांगला होता. महापालिकेला आणि संबंधित कंपनीला प्रकल्प राबविता आला नाही. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्यामुळे शहरात तीन वर्षांनंतर निश्चितच मोठ्या प्रमाणात पाणी येईल. सर्वसामान्य नागरिकांची दररोज तहान भागेल. महापालिकेने राज्यातील इतर शहरांप्रमाणे पाणीपट्टी ठेवावी.

जगदीश ढाकणे, गजानन कॉलनी, गारखेडा.

पाण्याशिवाय शहराचा विकास अशक्य

१९८० च्या दशकात आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ख्याती होती. तेव्हा येथे मुबलक प्रमाणात पाणी आणि कमी लोकसंख्या होती. आता नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरात मुबलक प्रमाणात पाणी आल्यास सर्वांगीण विकास शक्य आहे. आठ दिवसांतून एकदा पाणी या प्रक्रियेला नागरिक प्रचंड वैतागले आहेत. प्रत्येक गरीब व्यक्तीला पाणी आठ दिवसांकरिता साठवून ठेवता येत नाही.

मोहम्मद बिलाल, बुढीलेन.

उद्योगधंदे वाढतील

शहरात पाणी नसल्यामुळे मोठ-मोठे उद्योग येण्यास तयार नव्हते. आता शाश्वत पाणी येणार असल्याने उद्योगधंदे येतील. शहराच्या आसपास असलेल्या नवीन वसाहतींना पाणी मिळेल. उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेली योजना शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. प्रत्येक नागरिकाला दररोज पाणी मिळावे हीच रास्त अपेक्षा.

पवन अधाने पाटील, हडको.