शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे सिंचन विहिरींच्या मागणीची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:20 IST

पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींच्या मागणीची आॅनलाईन नोंद अद्ययावत केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देमराठवाड्यात केवळ औरंगाबाद जिल्ह्यामध्येच सर्वाधिक कमी सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे. यासंदर्भात जिल्हाभरातून हजारो शेतकर्‍यांनी सिंचन विहिरींसाठी अर्ज केले आहेतपरंतु पंचायत समितीस्तरावर शेतकर्‍यांनी मागणी केलेल्या सिंचन विहिरींची आॅनलाईन मागणी अद्ययावत केली जात नाही.

औरंगाबाद : पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींच्या मागणीची आॅनलाईन नोंद अद्ययावत केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आॅनलाईन मागणी नोंद न करणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे. त्याचा शोध घेऊन कारवाई करा, या शब्दात स्थायी समितीच्या बैठकीत आज गुरुवारी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सुनावले.

मराठवाड्यात केवळ औरंगाबाद जिल्ह्यामध्येच सर्वाधिक कमी सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे. यासंदर्भात जिल्हाभरातून हजारो शेतकर्‍यांनी सिंचन विहिरींसाठी अर्ज केले आहेत; परंतु पंचायत समितीस्तरावर शेतकर्‍यांनी मागणी केलेल्या सिंचन विहिरींची आॅनलाईन मागणी अद्ययावत केली जात नाही. परिणामी सिंचन विहिरींसाठी शासनाकडून निधीच दिला जात नाही. मागील ७-८ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. ही बाब प्रशासन म्हणून आपण गांभीर्याने घेणार आहात का नाही, असा प्रश्न सदस्य किशोर बलांडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना केला. यावेळी बलांडे यांनी फुलंब्री तालुक्यातील ९२ शेतकर्‍यांनी सिंचन विहिरींसाठी अर्ज केले होते. त्यापैकी अवघ्या १५ शेतकर्‍यांची मागणी आॅनलाईन अद्ययावत झाल्याचा पुरावाच ‘सीईओ’ यांच्यासमोर ठेवला. तेव्हा ‘सीईओ’ आर्दड यांनी यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून त्या समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये आॅनलाईन मागणी अद्ययावत का केली जात नाही, याची खातरजमा केली जाईल.  दोषी कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. 

कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारीशिक्षकांची बिंदू नामावली सदोष आहे. सेवानिवृत्त, मृत्यू पावलेल्या शिक्षकांची नावे बिंदू नामावलीतून काढून टाकलेली नाहीत. राखीव जागांवर नियुुक्त शिक्षकांना खुल्या जागांवर दाखविण्यात आले आहे, अशी तक्रार काही शिक्षकांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने यासंदर्भात समिती नेमून बिंदू नामावलीची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले होते. समितीने तपासणीमध्ये त्रुटी दूर करून खुल्या प्रवर्गातील ५९ शिक्षकांच्या जागा वाढविल्या. तथापि, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी २७ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. त्याच दिवशी जि. प. अध्यक्षा तसेच ‘सीईओं’नी बिंदू नामावलीचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी आपल्या सहकार्‍यांसह कार्यालयात बसून रात्री १२ वाजेपर्यंत तपासणी केली व खुुल्या प्रवर्गातील तब्बल ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने येण्याचा मार्ग मोकळा केला. याबद्दल त्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले.