शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत सूर्य आग ओकतोय

By admin | Updated: May 16, 2016 00:22 IST

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे.

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईनेदेखील गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. परिणामी लहान बालकांबरोबर प्रौढ व्यक्तींनादेखील विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. एप्रिलमध्ये अंगणवाड्यांच्या माध्यमातून वजन घेण्यात आलेल्या बालकांपैकी जवळपास १४ हजार बालकांच्या वजनात कमालीची घट झाल्याचा खळबळजनक अहवाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. जिल्ह्यात ३ हजार १७८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये २ हजार ७०० मोठ्या अंगणवाड्या, तर ४७८ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमध्ये नोंदणी केलेल्या बालकांची संख्या २ लाख ३६ हजार ६९२ एवढी असून, दरमहा या बालकांचे वजन केले जाते, तसेच अंगणवाड्यांमार्फत बालकांना पोषण आहार तसेच आरोग्य पूरक सुविधाही पुरविल्या जातात. याशिवाय अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुलींना आरोग्यविषयक सल्ला, आरोग्य तपासणी केली जाते. तापमानामुळे उड्डाणपूलही तापलावैशाखातील उन्हाचा तडाखा सर्व स्तरावर बसतो आहे. एमएसआरडीसीने बांधलेल्या महावीर चौकातील उड्डाणपुलालादेखील उन्हाचा फटका बसल्याचे ‘प्रूफ लोड टेस्ट’च्या पहिल्या दिवशी लक्षात आले. मुंबईतील व्हीजेटी या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन समितीमार्फत त्या उड्डाणपुलाचे तापमान आणि उच्च वजन क्षमता तपासण्यासाठी रविवारी दुपारी १२.१० मिनिटांनी सुरुवात केली. सोमवारी दुपारपर्यंत हे काम चालेल. डॉ.अभय बंबोले, गौरंग राऊत व टीमने पुलाच्यावर १५० टन वजन असलेले ट्रक उभे करून खाली डायल गेज, डिप्लिकेशन सेन्सरनुसार पुलाच्या क्षमतेच्या चाचणीचे नमुने संकलित केले. इंडियन रोड काँग्रेसच्या कोड नं. ५१ नुसार गुणवत्ता तपासणी करावी लागते. या तपासणीच्या प्रमाणपत्रानंतरच पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पूल वाहतुकीला खुला होईल. २४ तासांपर्यंत १५० टनाचे सहा ट्रक पुलाच्या ५० मीटर अंतराच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहेत. एका ट्रकमध्ये २५ टन वजनाचे साहित्य होते.