शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

औरंगाबादेत सूर्य आग ओकतोय

By admin | Updated: May 16, 2016 00:22 IST

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे.

औरंगाबाद : साधारणपणे मार्चपासूनच सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तापमान ४२ अंश सेल्शिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात पाणीटंचाईनेदेखील गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मिळेल ते पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. परिणामी लहान बालकांबरोबर प्रौढ व्यक्तींनादेखील विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. एप्रिलमध्ये अंगणवाड्यांच्या माध्यमातून वजन घेण्यात आलेल्या बालकांपैकी जवळपास १४ हजार बालकांच्या वजनात कमालीची घट झाल्याचा खळबळजनक अहवाल समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. जिल्ह्यात ३ हजार १७८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये २ हजार ७०० मोठ्या अंगणवाड्या, तर ४७८ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमध्ये नोंदणी केलेल्या बालकांची संख्या २ लाख ३६ हजार ६९२ एवढी असून, दरमहा या बालकांचे वजन केले जाते, तसेच अंगणवाड्यांमार्फत बालकांना पोषण आहार तसेच आरोग्य पूरक सुविधाही पुरविल्या जातात. याशिवाय अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुलींना आरोग्यविषयक सल्ला, आरोग्य तपासणी केली जाते. तापमानामुळे उड्डाणपूलही तापलावैशाखातील उन्हाचा तडाखा सर्व स्तरावर बसतो आहे. एमएसआरडीसीने बांधलेल्या महावीर चौकातील उड्डाणपुलालादेखील उन्हाचा फटका बसल्याचे ‘प्रूफ लोड टेस्ट’च्या पहिल्या दिवशी लक्षात आले. मुंबईतील व्हीजेटी या संस्थेने प्रकल्प व्यवस्थापन समितीमार्फत त्या उड्डाणपुलाचे तापमान आणि उच्च वजन क्षमता तपासण्यासाठी रविवारी दुपारी १२.१० मिनिटांनी सुरुवात केली. सोमवारी दुपारपर्यंत हे काम चालेल. डॉ.अभय बंबोले, गौरंग राऊत व टीमने पुलाच्यावर १५० टन वजन असलेले ट्रक उभे करून खाली डायल गेज, डिप्लिकेशन सेन्सरनुसार पुलाच्या क्षमतेच्या चाचणीचे नमुने संकलित केले. इंडियन रोड काँग्रेसच्या कोड नं. ५१ नुसार गुणवत्ता तपासणी करावी लागते. या तपासणीच्या प्रमाणपत्रानंतरच पूल वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पूल वाहतुकीला खुला होईल. २४ तासांपर्यंत १५० टनाचे सहा ट्रक पुलाच्या ५० मीटर अंतराच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहेत. एका ट्रकमध्ये २५ टन वजनाचे साहित्य होते.