शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी अशीही

By admin | Updated: August 10, 2014 02:04 IST

औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणूनही दृढ होते आहे,

औरंगाबाद : डीएमआयसीमुळे सर्वांनाच दृष्टिकोन बदलावा लागला. त्यामुळेच ऐतिहासिक औरंगाबादची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणूनही दृढ होते आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शनिवारी (दि. ९) येथे आयोजित कार्यक्रमात केले. ‘डीएमआयसी : औरंगाबादचा बदलता चेहरा’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, हा प्रकल्प एवढा मोठा आहे की, प्रारंभी प्रत्येकालाच तो प्रत्यक्षात येण्याविषयी शंका होती. परंतु आम्ही अंमलबजावणी केली व चित्र बदलले. डीएमआयसीची सर्वच प्रक्रिया आमच्यासाठी ‘लर्निंग प्रोसेस’ होती. या प्रकल्पावर काम करताना आम्हा सर्वांनाच आपला दृष्टिकोन बदलावा लागला.जुन्या भूसंपादन कायद्यानुसार एवढे मोठे भूसंपादन शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभाव दिला. बिडकीनच्या शेतकऱ्यांना तर २३ लाख रुपये एकरी भाव दिला. त्यामुळे आता अनेक शेतकरी आमच्याकडे येऊन पुढील संपादन केव्हा करणार, अशी विचारणा करीत आहेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना जी १५ टक्के जागा परत द्यायची आहे, ती मूलभूत सोयी- सुविधा विकसित करूनच द्यावी, असाही निर्णय घेतला. डीएमआयसीमुळे या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. पर्यावरणपूरक औद्योगिक शहर येथे उभे राहील. मराठवाड्यात आकाराला आलेले आॅटो क्लस्टर, जालन्यातील स्टील क्लस्टर हे येथील उद्योजक व कामगारांची बदललेली मानसिकता दर्शविते, असे सांगून अहिर म्हणाले, महाराष्ट्रात आता उद्योग उभारणीसाठी चाकणनंतर दुसरी पसंती औरंगाबादला मिळते आहे. या शहराची ओळख आता औद्योगिकनगरी म्हणून होते आहे.