शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

औरंगाबाद-नगर रेल्वेमार्गामुळे शेती, उद्योगाला मिळेल चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:02 IST

जयेश निरपळ गंगापूर : केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी दिलेल्या औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण २ ते ६ ...

जयेश निरपळ

गंगापूर : केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात सर्वेक्षणास मंजुरी दिलेल्या औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण २ ते ६ मार्च दरम्यान होणार आहे. या मार्गात गंगापूरचा समावेश असून, तालुक्यातील शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा केला जात होता.

प्रस्तावित रेल्वेमार्गावर फक्त औरंगाबादवरून पुणेला जाणाऱ्या प्रवाशांनाच फायदा होणार नाही, तर या मार्गावरील आधुनिक शेती, उद्योगांना याचा मोठा फायदा होईल. आजघडीला दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी व खर्चिक साधनांमुळे शेतीमाल काही मर्यादेपर्यंत राहिला आहे. औरंगाबाद-अहमदनगर हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास शेतीमालाला परराज्यांतील मोठ्या बाजारपेठांचा पर्याय अगदी कमी खर्चात उपलब्ध होईल.

वाळूज परिसरातील उद्योगधंद्यांना देखील याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक मालवाहतूक बंगलोर, कोलकाता यासारख्या शहरांतून करणे जलद होईल. स्थानिक व्यापाऱ्यांची देखील व्यापारी शहरांंशी कनेक्टिव्हिटी वाढून मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाचणार आहे. हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात सुरू झाल्यास मध्य रेल्वेमार्फत तालुका थेट दक्षिण व पूर्व रेल्वेस जोडणे सहज शक्य होईल.

शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांना आपल्या मालाची मालवाहतूक करणे सोयीस्कर होणार आहे. रेल्वेला मुख्य उत्पन्न हे मालवाहतुकीतूनच मिळत असल्याने भारतीय रेल्वेला देखील याचा फायदा होईल. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होईल. त्यामुळे हे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

------------------

आमच्या डाळींब, कांदा व पपईला परराज्यांत मोठी मागणी आहे; परंतु इतर वाहनाने ते पाठविणे परवडत नाही. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास शेतकऱ्यांना परराज्यांत मोठ्या प्रमाणात सामूहिक माल पाठविता येईल. - डॉ. उद्धवराजे काळे पाटील, उद्योजक तथा शेतकरी

स्थानिक बाजारपेठेतून जादा दराने खरेदी करावे लागणारे पॅलेट इंधन हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास आम्हाला परराज्यांतून स्वस्तात व थेट आयात करणे सोईस्कर होईल. - विशाल गायकवाड, उद्योजक.

इतर शहरांतून माल वाहतूक करताना मालाची खूप चढ-उतार होते. यामध्ये नुकसान तर होतेच, शिवाय वेळ व पैसा जास्त जातो. या मार्गामुळे आम्हाला हे सर्व नुकसान टाळता येईल. - प्रवीण पारख, व्यापारी.