शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

औरंगाबाद कचरा प्रश्न : विरोध केल्यास पोलीस बळाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:02 IST

नारेगाव कचरा डेपोत शहरातील कचरा टाकू देण्याच्या विरोधात १४ गावांच्या नागरिकांनी १५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले असून, त्यांच्यासमोर मनपा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विभागीय प्रशासन हतबल ठरले आहे. संतप्त झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने आता नारेगाव वगळता इतरत्र ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून जनतेचा विरोध मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून प्रशासन हतबल : नगरसेवकांसह नातेवाईकांनी विरोध केल्यास गुन्हा दाखल करून अपात्र ठरविणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोत शहरातील कचरा टाकू देण्याच्या विरोधात १४ गावांच्या नागरिकांनी १५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले असून, त्यांच्यासमोर मनपा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विभागीय प्रशासन हतबल ठरले आहे. संतप्त झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने आता नारेगाव वगळता इतरत्र ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून जनतेचा विरोध मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांसह नातेवाईकांनी कचरा घेऊन जाणारी वाहने रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. शिवाय त्यांना नगरसेवकपदावरून अपात्र ठरविण्याची कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी शनिवारी दिला.मनपाने शोधलेल्या जागांवर कचरा टाकण्यास विरोध करणाºया नागरिकांना रविवारपासून पोलिसांच्या लाठीचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मनपाने कांचनवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, हनुमान टेकडी या परिसरात कचरा टाकण्याचा पर्याय निवडला; पण नागरिकांच्या विरोधापुढे अंतिम निर्णय होत नाही. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची तातडीची बैठक शनिवारी झाली. बैठकीला मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर आदींची उपस्थिती होती. काल शुक्रवारी दुपारनंतर नारेगावमधील नागरिकांसोबत बैठक घेण्यात आली; परंतु त्यातून काहीही साध्य झाले नाही. शनिवारी सायंकाळपर्यंत निर्णय कळवितो, असा शब्द देत नारेगाव-मांडकीच्या शिष्टमंडळाने काढता पाय घेतला.विशेष पॅकेज देऊविभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले की, कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. ३ महिन्यांची मुदत नारेगावच्या शिष्टमंडळाकडे मागितली आहे. त्या लोकांना झालेला त्रास मान्य आहे. त्यासाठी नागरिकांना विशेष पॅकेज सुविधांसाठी देता येईल. रस्तेविकास, कुत्र्यांचा बंदोबस्त, दूषित पाणी यासाठी आराखडा तयार करण्यात येईल.प्रदूषण मंडळ, उद्योग सीएसआर, शासनाकडून निधी घेता येईल; पण यासाठी वेळ लागेल. या मुद्यांवर शुक्रवारी २ तास चर्चा झाली; पण निर्णय झाला नाही. शासनाने नेमलेल्या समितीच्या प्रत्येक बैठकीला नारेगाव-मांडकीतील नागरिकांनी नेमलेल्या सदस्यांना बोलाविले जाईल. त्यांच्यासमक्षच बैठकीचा अहवाल शासनाकडे जाईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.सर्वपक्षीय, संस्था, संघटनांची उद्या बैठकशहरातील कचºयाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय, सामाजिक संघटना, एनजीओंच्या व्यापक बैठकीचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसमावेशक तोडगा निघावा म्हणून ५ मार्च रोजी सरस्वती भुवन महाविद्यालयातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ही बैठक होईल.१६ दिवसांपासून शहरातील कचºयाचा प्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री दीपक सावंत यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कचºयाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.या विषयावर सर्वसमावेशक तोडगा निघावा म्हणून राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना, अशासकीय संस्था, कचºयासंदर्भात काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आदींच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केवळ कचºयासाठी शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आ. इम्तियाज जलील, आ. सुभाष झांबड, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी आमदार प्रदीप जैस्वाल, उद्योजक राम भोगले, माजी मनपा आयुक्त के. बी. भोगे, डॉ. भालचंद्र कानगो, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे नियोजन माजी नगरसेवक तथा कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात, माजी नगरसेवक समीर राजूरकर, गौतम लांडगे आदींनी केले आहे.