शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची परीक्षा; औरंगाबाद नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:12 IST

उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ३१ जुलै रोजी निकाल घोषित करण्याचा मुहूर्त हुकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई विद्यापीठाच्या विधिसह इतर अभ्यासक्रमांच्या ५ हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आॅनलाइन पाठविण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ३१ जुलै रोजी निकाल घोषित करण्याचा मुहूर्त हुकल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने निकाल रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याची दखल विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घेत ३१ जुलैपूर्वी निकाल लावण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दिले होते.राज्यपालांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नागपूर, पुणे येथील विद्यापीठांकडे काही अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आॅनलाइन पाठविल्या होत्या. याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडेही ५ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका आॅनलाइन पाठविण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिका तपासणीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाच्या अधिकाºयांकडे सोपवली होती. या प्राध्यापकांकडून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात करतानाच तांत्रिक अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली. यामुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयातील संगणक लॅबमधून या उत्तरपत्रिका व्यवस्थापनशास्त्र विभागात तपासण्याचा निर्णय झाला; मात्र मुंबई विद्यापीठाने उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी दिलेला पासवर्ड जुळत नसल्यामुळे कामकाज सुरूच झाले नाही. शनिवारी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. तरीही तांत्रिक अडचणी दूर होऊ शकल्या नाहीत. यामुळे मुंबई विद्यापीठातील अधिकारी या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी मुंबईला परतल्याचे समजते. ते पुन्हा औरंगाबादेत पोहोचल्यानंतरच उत्तरपत्रिका तपासण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही सूत्रांनी सांगितले. यामुळे ३१ जुलैपर्यंत उत्तरपत्रिका तपासून देण्याचा मुहूर्त हुकला आहे.