शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ निवृत्तावर पुन्हा मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास पुन्हा एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, असा निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. या निर्णयाला १४ महिने उलटण्याच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांना परीक्षा विभागात एकत्रित वेतनावर नियुक्ती देत, त्यांची नेमणूक नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या विभागात केली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा विभागात नियुक्त्या : आस्थापना विभागाच्या आदेशाचा प्रशासनाला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास पुन्हा एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, असा निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. या निर्णयाला १४ महिने उलटण्याच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांना परीक्षा विभागात एकत्रित वेतनावर नियुक्ती देत, त्यांची नेमणूक नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या विभागात केली आहे.विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुनश्च विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, जर संबंधित विभागप्रमुखांनी अशा प्रकारची नियुक्ती दिल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही. संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहील, अशा आशयाचे परिपत्रक तत्कालीन कुलसचिवांनी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी काढले होते. याविषयाचा धोरणात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतला असल्याचेही संबंधित आदेशात म्हटले होते. मात्र, यास बरोबर १४ महिने संपण्याच्या आतच सेवानिवृत्त झालेल्या ३ कर्मचाºयांना दोन दिवसांपूर्वी परीक्षा विभागात नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात आर. पी. वाघ, एस. पी. दाभाडे आणि के. के. पैठणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या नेमणुका वादग्रस्त ठरलेल्या अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात केल्या आहेत. मागील वर्षी १६ मेच्या मध्यरात्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तरपत्रिकाचे सील फोडून विद्यार्थ्यांना एका नगरसेवकाच्या घरी लिहिण्यास देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यात पोलिसांनी छापा मारत मोठे रॅकेट उघडकीस आणले. यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी १९ मे २०१७ रोजी परीक्षा संचालकांचा पदभार काढत अभियांत्रिकी विभागातील सर्वच कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यातून कोणीही सुटले नव्हते. यानंतर १ ते ३ जूनदरम्यान परीक्षा विभागासह इतर ठिकाणी ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या १२५ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाºयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. यास सहा महिने होण्याच्या आतच परीक्षा विभागातून बदल्या झालेले अधिकारी, कर्मचारी पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचले आहेत. अनेक वर्षांपासून परीक्षा विभागात काम करत असल्यामुळे त्यांची तेथील कामाची माहिती आहे. दुसºया कोणाची नियुक्ती केली, तर परीक्षा विभागाचे काम थांबेल, अशी भीती कुलगुरूंना दाखविण्यात येते. यामुळे एक-दोन अशा सतत बदल्या होत पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झालीे.परीक्षा विभाग पूर्वपदावरपरीक्षा विभाग नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. ‘साई’ प्रकरणानंतर साफसफाई मोहीम राबविण्यात आली होती. नुकत्याच वसंतराव नाईक महाविद्यालयात एम.ए. व्यवस्थापनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकाºयांनी महाविद्यालय प्रशासनावर दबाव टाकल्याचे समोर आले होते. याचवेळी बदल्या झालेले सर्व कर्मचारी आणि आता सेवानिवृत्तही पुन्हा मूळ ठिकाणी आल्यामुळे सर्व काही पूर्वपदावर आले असल्याची चर्चाही दबक्या आवाजात विद्यापीठात सुरू आहे. नेमणूक केलेल्या तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांमधील एकाला १० तर दोघाला १५ हजार रुपये एकत्रित वेतन देण्यात येणार आहे.