शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

औरंगाबाद जिल्ह्याला बसणार स्पील ओव्हरचा फटका; ५२ कोटींच्या कामांना कात्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:41 IST

जिल्हा नियोजन समितीच्या ३० टक्के अनुदान कपातीमुळे वाढणार्‍या स्पील ओव्हरचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसणार आहे. ५२ कोटींच्या कामांना थेट कात्री लागणार असून, यामुळे वाढणार्‍या स्पील ओव्हर (शिल्लक कामे)ची लायबिलिटी (जबाबदारी) जिल्हा प्रशासनावर येणार आहे.

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीच्या ३० टक्के अनुदान कपातीमुळे वाढणार्‍या स्पील ओव्हरचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसणार आहे. ५२ कोटींच्या कामांना थेट कात्री लागणार असून, यामुळे वाढणार्‍या स्पील ओव्हर (शिल्लक कामे)ची लायबिलिटी (जबाबदारी) जिल्हा प्रशासनावर येणार आहे. ही रक्कम भविष्यात शासनाच्या नियोजनात आली नाही, तर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सिव्हिल वर्कच्या कामाला मोठ्या प्रमाणात कात्री लागण्याची शक्यता आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, मनपा आयुक्त डॉ. डी. एम. मुगळीकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी नवल किशोर राम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, स्पील वाढेल; परंतु कामे पूर्ण केली जातील. बैठकीत पूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला. २४४ कोटींपैकी  नियोजनात असलेले कुठलेही काम कमी होणार नाही. निधी कमी पडला तर पुढील वर्षीच्या नियोजनात तो समाविष्ट होईल. ज्या विभागांची विकासकामे प्रलंबित आहेत, अशा विभागांनी विहित मुदतीत ती कामे पूर्ण करावीत, नसता अशा प्रलंबित कामांची जबाबदारी ठरवून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. 

प्राप्त निधीतून विकासकामे पूर्ण कराजिल्ह्यातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे विभागांना देण्यात आलेला निधी खर्च करून विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी दिल्या. सर्व विभागांनी विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. ज्या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे, अशा विभागांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा. संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृह यांच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

मंजूर असलेला निधीवर्ष २०१७-१८ साठी २२४ कोटींची मर्यादा होती. त्यात २० कोटी ७५ लाख वाढीसह २४४ कोटी ७५ लाख तरतूद झाली. ५२ कोटी शासनादेशानुसार कपात झाल्याने १९२ कोटींचा निधी उपलब्ध आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी ६ पैकी ३ कोटी निधी मिळेल. आजवर १२३ कोटींचा खर्च झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ३६ कोटींचा निधी दिला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद