शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

औरंगाबाद जिल्ह्यात मुद्रा लोनची ९० टक्के कर्ज प्रकरणे बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:42 IST

महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी बँकांना दलालमुक्त करा व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात मागील ३ वर्षे ८ महिन्यांत ११३५ कोटींचे मुद्रा लोन वाटप करण्यात आले. मात्र, यातील ९० टक्के कर्ज प्रकरणे बोगस आहेत. लाभार्र्थींना याचा लाभ झालाच नाही यात मध्यस्थांनी (दलाल) हात धुऊन घेतले आहे. यातून रोजगार निर्मिती कागदावरच झाली. दलालच श्रीमंत झाले आहेत, असा गंभीर आरोप करीत महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी बँकांना दलालमुक्त करा व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी केली आहे. 

यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत तुळजापूरकर यांनी सांगितले की, देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ रोजी २० हजार कोटी रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिटस् डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेला सुरुवात झाली. ही योजना खूप चांगली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ पर्यंत ११३५ कोटी रुपयांचे वाटप झाले. त्यात चालू आर्थिक वर्षात ३०५ कोटींचा समावेश आहे. मात्र, यातील ९० टक्के प्रकरणातील कर्जदार बोगस आहेत. दलाली करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी अक्षरश: बँकांना लुटले आहे.

या दलालांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना धमक्या देऊन दबाव आणून कर्ज मंजूर करून घेतले आहेत. कर्ज मंजुरीपैकी लाभार्थीला फक्त २० ते ३० टक्के रक्कम देऊन बाकीची ७० ते ८० टक्के रक्कम दलालांनी हडप केली आहे. मुद्रा लोन योजनेतून बोगस लाभार्थी दाखवून दलाल श्रीमंत झाले आहेत.

तुळजापूरकर पुढे म्हणाले की, आता बँकेच्या व्यवस्थापक, अधिकाऱ्यांवर हल्ले होऊ लागले आहेत. धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. बँकांसमोर तथाकथित सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनांच्या नावाने मंडप उभारून एकानंतर एक ठरवून उपोषणाला बसत आहेत व दबाव आणत आहेत. एवढेच नव्हे तर बोगस कर्ज मंजूर न करणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापकाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची धमकी दिली जाऊ लागली आहे. जेएनईसीतील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतील व्यवस्थापकाला धमकी, तर युनियन बँकेच्या शाखेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे आता बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. कधीही काहीही गंभीर घटना होऊ शकते, यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तुळजापूरकर यांनी केली. सर्व बँकांतील अधिकाऱ्यांतर्फे येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना आवर घाला व दलालांपासून बँकमुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

ठराविक कापड, भांडे दुकान, ब्युटिपार्लरचे सर्वाधिक कोटेशनदेवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, ११३५ कोटी रुपये मुद्रा लोन वाटप झाले त्यात ठराविक कापड, भांडी दुकानदार व ब्युटिपार्लरचे कोटेशन जोडल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाले त्या तुलनेत दुकाने उघडली नाहीत. कारण, पैसा दलालांच्या खिशात गेला. याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

मुद्रा लोनच्या रकमेतून गुंडगिरी पोसली जातेतुळजापूरकर यांनी आरोप केला की, मुद्रा लोन मिळवून देणारे दलाल कोणत्या एका राजकीय पक्ष, संघटनेचे नाहीत. बोगस लाभार्थीच्या माध्यमातून मिळालेल्या मुद्रा लोनच्या पैशावर शहरातील गुंडगिरी पोसल्या जात आहे. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे मुद्रा लोन मंजूर करून घेण्यासाठी आणखी दबाव वाढत जाईल, ही गंभीर बाबही त्यांनी सर्वांच्या निदर्शनात आणून दिली. 

दलालांचे दुष्टचक्र औरंगाबादेतच महाराष्ट्रात आतापर्यंत १ कोटी २६ लाख १०,९७१ लोकांना ६५ हजार ७३३.४१ कोटी रुपयांचे मुद्रा लोन वाटप झाले आहे.दलालांचे दुष्टचक्र फक्त औरंगाबादेतच असल्याचे तुळजापूरकर यांनी सांगितले. बाकीच्या जिल्ह्यात मुद्रा लोनची अंमलबजावणी चांगली आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :bankबँकfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना