शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

औरादचे जलकुंभ धोक्यात !

By admin | Updated: May 24, 2014 01:36 IST

बालाजी थेटे, औराद शहाजानी निलंगा तालुक्यातील ३० हजार लोकसंख्या असलेल्या औराद शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कुचकामी झाली

बालाजी थेटे, औराद शहाजानी निलंगा तालुक्यातील ३० हजार लोकसंख्या असलेल्या औराद शहराला पाणीपुरवठा करणारी योजना कुचकामी झाली असून, १९८० साली बांधलेला जलकुंभ त्यावेळी ५ हजार लोकसंख्या गृहित धरून बांधला होता. याची दुरवस्था झाली असून, या जलकुंभाला अनेक तडे गेले आहेत. निकामी झाले तरी याचा वापर केला जात आहे. तेरणा-मांजरा नदीच्या संगमावर वसलेल्या औराद गावाला तिन्ही बाजूने पाणीसाठा आहे. पण निम्म्या गावात अद्याप नळयोजना काय असते, याचा गंधच नाही, अशी अवस्था आहे. १९८० साली ५ हजार लोकसंख्या ग्राह्य धरून जलकुंभ बांधण्यात आला. हा जलकुंभ आजघडीला पडण्याच्या स्थितीत आहे. याला तडे गेले आहेत. जीण्याच्या पायर्‍या पडल्या आहेत. तरीपण इतर पर्यायी पाणीसाठा करण्यासाठी दुसरा पर्याय नाही म्हणून या टाकीचा वापर केला जात आहे. प्रशासनाने याची पाहणी करून इतर पर्यायी जलकुंभ बांधून ही टाकी पाडावी, असे म्हटले जात आहे. अद्याप याचा पर्याय उभा राहू शकला नाही. औराद शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन औराद ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत सहभाग घेतला आहे. यात नवीन जलकुंभ, नवीन पाईपलाईन व इतर साहित्यासाठी ८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. याचा सर्वेही झाला आहे. पुढील मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण अद्याप राज्य शासनाकडून मंजुरी येणे बाकी आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी टी.डी. बिरादार यांनी दिली. याविषयी उपसरपंच डॉ. मल्लिकार्जुन शंकद म्हणाले की, टाकीची क्षमता कमी आहे. पण पाणी साठविण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था नाही. यामुळे या टाकीचाच पाणीपुरवठ्यासाठी वापर केला जात आहे. औराद गावाचा विस्तार वाढला, पण या वाढीव गणेश नगर, शास्त्री नगर, बसस्थानक परिसर, सैफ अली नगर, शिवाजी चौकासह आदी नवीन वाढीव शहरात नळयोजना अद्याप पोहोचलीच नाही. काही भागात मिनी वॉटर सप्लाय योजना आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या भागातील नागरिकांनी स्वखर्चातून खाजगी विंधन विहीर मोठ्या प्रमाणात घेतल्या आहेत.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या तिन्ही बाजूंनी जलसाठे उपलब्ध आहेत. तरीही गावातील काही भागांत अजूनही जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. १९८० साली बांधण्यात आलेल्या या जलकुंभाला तडे गेल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीची मागणी होत आहे.