शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या विधी शाखेच्या परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. दुसरीकडे, ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या विधी शाखेच्या परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. दुसरीकडे, वकिली व्यवसाय करण्यासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या ‘ऑल इंडिया बार इक्झामिनेशन’ या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख १५ जुलै होती. मात्र, निकाल न लागल्यामुळे अंतिम वर्षाच्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता आले नाहीत.

विद्यापीठाने मे महिन्यात विधी शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. तथापि, प्रथम वर्षाचे प्रवेश उशिरा झाल्यामुळे या वर्षाची परीक्षा जूनच्या शेवटच्या सुरू झाली व ती जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपली. द्वितीय व तृतीय वर्षांचे निकाल तयार आहेत; परंतु अगोदर प्रथम वर्षाचे निकाल जाहीर केल्याशिवाय पुढील वर्षांचे निकाल जाहीर करता येत

नाहीत, असा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे.

विशेष म्हणजे, अन्य पारंपरिक अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांना गुरुवारपासून (२९ जुलै) सुरुवात होणार असून, विधी शाखेच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांचाच निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. या विद्यार्थ्यांकडून अजून दुसऱ्या सहामाही परीक्षांसाठी अर्जही मागविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

चौकट...............

ऑल इंडिया बार परीक्षा

कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली व्यवसाय करण्यासाठी ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. विधी विद्याशाखेचे पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते.

चौकट............

आठवडाभरात लागतील निकाल

यासंदर्भात विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी सांगितले की, विधी शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षेचे निकाल तयार आहेत; परंतु प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. आठवडाभरात या शाखेच्या सर्वच वर्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.