शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

हंगामी वसतिगृहांची हजेरी ‘कागदा’वरच!

By admin | Updated: December 8, 2015 00:07 IST

संजय तिपाले , बीड हंगामी वसतिगृहांमधील बोगसगिरीला आळा बसावा यासाठी लाभार्थ्यांच्या नोंदी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले;

संजय तिपाले , बीडहंगामी वसतिगृहांमधील बोगसगिरीला आळा बसावा यासाठी लाभार्थ्यांच्या नोंदी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले;परंतु वसतिगृहे सुरु होऊन सव्वा महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थी उपस्थितीच्या नोंदी रजिस्टरमध्येच घेणे सुरु आहे. त्यामुळे पारदर्शकर्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.१ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीत ऊसतोड कामगार रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची अबाळ होऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृृहे चालविली जातात. यावर्षी शासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची अट शिथिल केली आहे. नातेवाईकांकडे राहून केवळ जेवण व इतर सुविधा घेण्यासाठी वसतिगृहांचा आधार घ्यावा, असे अपेक्षित आहे. एका विद्यार्थ्यावर सहा महिन्यांत तब्बल ८ हजार २०० रुपये खर्चाची तरतूद आहे.आराखड्यात २५ हजार ६०० इतक्या विद्यार्थ्यांसाठी २० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, अद्याप ना विद्यार्थ्यांसाठीचे अनुदान आले ना उपस्थितीची नोंद घेण्यासाठी खरेदी करावयाच्या बायोमेट्रिक यंत्रासाठी! एका यंत्रासाठी अडीच हजार रुपयांचा खर्च होऊ शकतो. जिल्ह्यात ५४३ वसतिगृहे सुरु असून त्यासाठी १३ लाख ५७ हजार ५०० रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे.हंगामी वसितगृहात पहिली ते आठवीपर्यंतची मुले राहू शकतात. गतवर्षी २३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी वसतिगृहांचा आश्रय घेतला होता. यंदा या आकड्यात ९ हजार विद्यार्थी वाढले आहेत.४३२ हजार ८४६ विद्यार्थी हंगामी वसतिगृहात असल्याची नोंद सर्व शिक्षा अभियानच्या दफ्तरी आहे. दुष्काळी स्थिती असल्याने स्थलांतर वाढले असून परिणामी विद्यार्थीसंख्याही वाढल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.